- असे का होते?- आयुर्वेदानुसार, ऋतुबदलामुळे पचनशक्ती कमी होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही. न पचलेल्या आहाराच्या रसामुळे जेवण जात नाही.- उपाय काय?- ’सकाळी रिकाम्या पोटी सुंठ व मिरे यांचे चूर्ण घ्यावे.- ’दुपारी व रात्री जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा व सैंधव मीठ चघळून खावे.- ’जेवणानंतर गोड व ताजे ताक प्यावे. त्यात जिरे व मिरे पूड टाकावे. रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.- ’आले, लसूण, पुदिना यांची चटणी खावी.- यामुळे काय होते?- पचनशक्ती सुधारते- इतर काळजी काय घ्यावी?- ’शक्यतो लंघन (न जेवणे) करावे.- ’हलके व उकडलेले पदार्थ खावेत / तळलेले पदार्थ टाळावेत.- ’फिरणे व व्यायाम सुरू ठेवावा.वैद्य सदानंद सरदेशमुख