असे का होते?उष्ण हवामानामुळे शरीरातील उष्मा ही वाढतो. तसेच कमी होत असलेल्या द्रवांशामुळे त्यात आणखीनच भर पडते.काय करावे?चंदन , वाळा, धने, ताजा गुलाब हे पाण्यात भिजत घालून सकाळ संध्याकाळ घ्यावे. काळे मनुके, तुळशीचे बी, अंजीर रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी खावे. दूध तूप यांचा वापर करावा.यामुळे काय होते?शरीरातील उष्मा कमी होतो व शरीर थंड राहते. शरीरातील द्रवांशाचा समतोल राखला जातो.इतर काळजी काय घ्यावी?* तिखट खारट पदार्थ टाळावेत. * तळपाय व हाताला तूप लावून काशाच्या वाटीने घासावे. * चंदन, दूर्वा यांचा लेप लावावा.