अजीर्ण (अपचन) असे का होते? वर्षां ऋतूमध्ये भूक मंदावलेली असताना जड पदार्थ खाल्ल्याने अपचन होते. उपाय काय? ’सुंठ, मिरे, लेंडी िपपळी यांचे चूर्ण प्रत्येकी १/४ चमचा सकाळी-दुपारी-रात्री जेवणानंतर कोमट पाण्यासह घ्यावे. िलबाचा रस, िहग, मिरेपूड व जिरे पूड याचाही वापर करावा. जेवणात हलके पदार्थ अल्प प्रमाणात घ्यावेत अथवा पूर्णपणे लंघन करावे. यामुळे काय होते? ’खाल्लेल्या अन्नाचे पचन होते व पचनशक्ति सुधारते. इतर काय काळजी घ्यावी? ’हिरवे मूग, मसूर , ज्वारीची भाकरी, भाताची खिचडी यांचा आहारात समावेश ठेवावा.