गणेशचतुर्थीला पूजेमध्ये पत्री वाहाण्याच्या प्रथेमागे पूर्वजांनी जो वैज्ञानिक दृष्टीकोन दाखवला आहे, त्याला तोड नाही. मानवाच्या सभोवताली असणारा निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पुर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढय़ांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे निश्चीत. मात्र गणपतीला कोणत्या पत्री वाहायच्या असतात? त्या पत्री अर्पण करण्यामागे हेतू काय? या पत्रींचे औषधी गुणधर्म कोणते? याची माहिती देणारा लेख.

गणेशपूजनातील
२१ पत्री
मधुमालती, माका, बेल, दूर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, रुई, अर्जुन, विष्णुक्रान्ता, डािळब, देवदार, मरवा, िपपळस, जातिपत्र, केवडा, अगस्ती (हादगा)

।। सुमुखाय नम मालतीपत्रं समर्पयामि ।।
मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव – Jasminum Grandiflorum). ही पत्री वाहाताना  श्रीगणेशाचे ‘सुमुख’ हेच नाव वापरण्याचे कारण म्हणजे मालती ही प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

।। गणाधिपाय नम भृंगपत्रं समर्पयामि ।।
भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा तुम्हां-आम्हांला सर्वाना माहीत असलेला महत्त्वाचा उपयोग म्हणजे ‘केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

।। उमापुत्राय नम बेलपत्रं समर्पयामि ।।
गणेशपूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या पत्रींमधील तिसरी पत्री म्हणजे बेलाची पाने (Aegle Marmelos  ). बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतडय़ाच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इ.

।। गजाननाय नम दूर्वा समर्पयामि।।
 गजाननाचे स्मरण करून गणेशपूजन करताना वाहण्याची चवथी पत्री म्हणजे दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

।। लंबोदराय नम बदरीपत्रं समर्पयामि ।।
बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने ( Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा (भस्मक) आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदळ्याच्या कांजी बरोबर घेतल्यास स्थौल्य कमी होते. स्थौल्यामध्ये मनुष्याचे पोट मोठे होते. स्थौल्यावरचा बोरीचा उपयोग सूचित करण्यासाठी ‘लंबोदराय बदरीपत्रं समर्पयामि’ असे म्हटले असावे का?

।। हरसुनवे नम धत्तूरपत्रं समर्पयामि।।
धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) ते श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण जो योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच अमृतासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो; हे सूचित करण्यासाठी धत्तूर पत्रे वाहताना; जगतहितासाठी हलाहल(विष) सेवन करणाऱ्या श्रीगणेशाच्या पित्याचे, हर म्हणजे शंकराचे स्मरण धत्तूरपत्र अर्पण करताना श्रीगणेशाबरोबर केले आहे, असे दिसते.

।। गजकर्णाय नम तुलसीपत्रं समर्पयामि।।
गणेशपूजन करताना वाहण्याची सातवी पत्री म्हणजे तुळशीची पाने (Ocimum Sanctum). तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी; इतकी तुळस त्या दिवसामधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकरण (िरगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

।। वक्रतुण्डाय नम शमीपत्रं समर्पयामि ।।
शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द ‘शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

।। गुहाग्रजाय नम अपामार्गपत्रं समर्पयामि।।
अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera) आघाडय़ाचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी विशेष उपयुक्त असे आहेत. गुहाग्रज याचा अर्थ शिवाचा आद्य पुत्र आहे, मात्र गुहा याचा अर्थ गुह्य़ भागात वाढलेले असाही होतो. त्यामुळे स्त्री-प्रजनन अंगांच्या या अर्थाने गुह्य़ विकारामध्ये उपयुक्त असलेल्या आघाडय़ासंदर्भात ‘गुहाग्रजाय नम’ असे म्हटले असावे.

।। एकदंताय नम बृहतीपत्रं समर्पयामि।।
बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसम रुप असणाऱ्या िरगणीच्या फळे व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात सडण्याची प्रक्रिया थांबते. बृहतीपत्र अर्पण करताना ‘एकदंताय नम’ असा दंतवाचक नावाचा उल्लेख करुन बृहतीच्या या वैशिष्टय़ाकडे आपले लक्ष वळवण्याचा प्रयत्न पूर्वजांनी केला असेल का?

।। विकटाय नम करवीरपत्रं समर्पयामि।।
करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum) याचा उपयोग तारतम्याने करावा, हे सूचित करण्यासाठी आपल्या वैज्ञानिक वृत्तीच्या पूर्वजांनी कण्हेर अर्पण करताना श्रीगजाननाच्या विकट (उग्र) रुपाचा उल्लेख केला असावा; कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे (विकट) होते.

।। कपिलाय नम अर्कपत्रं समर्पयामि।।
अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे. रुईमधून निघणारा चीक हा कपिला गायीच्या दुधासारखा औषधी आहे, हे सुचवण्याचा विचार ‘कपिलाय नम’ असे म्हणण्यामागे असू शकेल.

।। गजदंताय नम अर्जुनपत्रं समर्पयामि ।।
अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna) अर्जुन सर्वात प्रसिद्ध आहे, तो हृदयपोषक गुणधर्माबद्दल. ‘अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणाऱ्या नसíगक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तीदंताप्रमाणे मजबूत होतील, हे ‘गजदंत’ नामाचा उल्लेख केला असावा.

।। विघ्नराजाय नम विष्णुक्रांता पत्रं समर्पयामि ।।
विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides) बुद्धी-स्मृतीवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करणारी या अर्थाने विघ्नराजाय नम म्हटले असावे.

।। बटवे नम  दाडिमपत्रं समर्पयामि।।
दाडिमपत्रे अर्थात डािळबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डािळबाचा समावेश होतो. डािळब आतडय़ाच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवम्र्सचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहिसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. बटुंना अर्थात लहान मुलांना होणाऱ्या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील  डाळींबाची उपयुक्तता दर्शवण्यासाठी ‘बटवे नम’ असे म्हटले असावे.

।। सुराग्रजाय नम देवदारुपत्रं समर्पयामि ।।
चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा  (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

।। भालचंद्राय नम मरुपत्रं समर्पयामि ।।
मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणाऱ्या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नसíगक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही.

।। हेरंबाय नम अश्वत्थपत्रं समर्पयामि ।।
अश्वत्थ पत्रे अर्थात िपपळाची पाने (Phycus Religiosa). िपपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपुर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या िपपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

।। चतुर्भुजाय नम जातीपत्रं समर्पयामि ।।
जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढय़ाने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

।। विनायकाय नम केतकीपत्रं समर्पयामि ।।
विनायकाचे स्मरण करुन श्रीगणेशाचे पूजन करताना अर्पण करावयाची विसावी पत्री म्हणजे केवडय़ाची पाने. (PendenusTectoritus). केवडय़ाच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप घालून हे सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवडय़ाचा लेप लावला जातो.

 ।। सर्वेश्वराय नम अगस्तिपत्रं समर्पयामि ।।
अगस्ती म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असते, हे आपण जाणतो. गंमत म्हणजे त्या जीवनसत्त्वाचे वनस्पतीज रूप अर्थात बीटाकॅरोटीन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात असते. गाजरापेक्षा कितीतरी जास्त!

(टीप : लेखामधील कोणत्याही वनस्पतींचे स्वयंप्रयोग करण्याची चूक करू नये, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे)