व्यवस्थापन महाविद्यालये तसेच काही तंत्रशिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना लेखी परीक्षा आणि मुलाखतीसोबत‘गटचर्चा’(ग्रूप डिस्कशन) हा अनिवार्य टप्पा पार करावा लागतो. गटचर्चेच्या वेळेस दिलेल्या विषयावर चर्चा करताना उमेदवाराच्या काही क्षमतांचे अवलोकन तज्ज्ञांद्वारे केले जाते. प्रामुख्याने उमेदवाराची समूहातील वर्तणूक, त्याची सांघिक वृत्ती, नेतृत्त्व क्षमता, स्वत:चे म्हणणे मांडण्याचे कसब अशा अनेक क्षमतांचा कस लागतो. गटचर्चा ही शक्यतो आठ-दहा जणांच्या समूहामध्ये ३० ते ४० मिनिटांत होते. गटचर्चेचा विषय मात्र बहुतांश वेळा चर्चा सुरू करण्याच्या वेळेस जाहीर केला जातो. त्यामुळे विषयाची पूर्वतयारी करायला वेळ मिळेलच, याची खात्री नसते.

या गुणांची चाचणी होते..
तुम्ही इतरांशी किती चांगल्या प्रकारे संवाद साधू शकता, दुसऱ्यांचे विचार किती मोकळेपणे स्वीकारता, गटचर्चा तुम्ही किती लक्षपूर्वक ऐकत आहात आणि त्यात सहभागी होत आहात, समूहाची उद्दिष्टे आणि स्वत:ची उद्दिष्टे यांना तुम्ही कशा प्रकारे महत्त्व देता हे या चर्चेतील तुमच्या कामगिरीतून अजमावले जाते.
गटचर्चेतून तुमचे संभाषणकौशल्य, आंतरसंबंध जपण्याची कला, नेतृत्वगुण, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, तार्किक विचारक्षमता, सृजनशीलता, चिकाटी, लवचीकपणा, दुसऱ्याच्या विचारांचा आदर करण्याची क्षमता या गुणांची चाचणी होते.

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी

तुमचा अपेक्षित सहभाग-
* तुम्ही बोलण्यात वाकबगार असायला हवे. तुम्ही नवीन, व्यावहारिक कल्पना मांडायला हव्या.
* चर्चेच्या वेळेस तुम्ही घेतलेली एक भूमिका कायम असावी. मात्र, दुसऱ्यांचे विचार खुल्या मनाने समजून घेण्याची तुमची तयारीही दिसायला हवी.
* समाजकारण-राजकारण-व्यापार-आर्थिक-विज्ञान-तंत्रज्ञान यांसारख्या विविध विषयांवरील सखोल ज्ञान ही तुमची जमेची बाजू असते.
* स्पष्ट शब्दोच्चार व देहबोली यांच्यावर मेहनत घ्या.
* चर्चेला दिलेल्या विषयासंबंधी तुमच्या मनात गोंधळ असेल तर चर्चेची सुरुवात तुम्ही करू नका. अपुरे ज्ञान व चुकीच्या दृष्टिकोनामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यापेक्षा दुसऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. त्यातून तुम्हाला काही मुद्दे सुचू शकतात व तुम्ही चर्चेत सहभाग घेऊ शकता.
* तुमची भाषा साधी सरळ असावी. बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावा. भाषेचा वापर जपून करा. अपशब्द वापरू नका.
* चर्चेच्या शेवटी तुम्ही निर्णायक मुद्दय़ावर सहमती, असहमती किंवा तटस्थता दर्शवू शकता.
* चर्चेदरम्यान सहभागी उमेदवारांशी आपुलकीने बोला. बोलताना नजरेस नजर मिळवून आत्मविश्वासाने बोलावे.
* दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे. त्याच्या मुद्दय़ाशी सहमत असल्यास होकारार्थी मान डोलवावी.
* बोलताना प्रत्येकाशी संवाद साधत आहात, असे दिसू द्या. एकाच व्यक्तीकडे बघून बोलू नका.

शिष्टाचार 

काय करावे?
* समूहातील प्रत्येकाशी प्रसन्न चेहऱ्याने बोला.
* प्रत्येकाच्या मताचा आदर करा.
* तुमची असहमती नम्रपणे व्यक्त करा.
* बोलायला सुरुवात करण्याआधी त्या विषयाचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करा.
* विषयाशी संबंधित मुद्दय़ावरच बोला. पाल्हाळिक बोलू नका.
* बोलताना देहबोलीचे शिष्टाचार पाळा.
* समोरच्याचा एखादा मुद्दा आवडल्यास त्यावर सहमती दाखवा.
काय करू नये?
* तुमच्या मताचे खंडन केले तर ओरडून बोलू नका.
* अनावश्यक हालचाली करू नका (जसे बोट नाचवणे, टेबलावर टकटक करणे, सतत पाय हलवणे इत्यादी)
* चर्चेवर वर्चस्व गाजवण्याचा अट्टहास बाळगू नका.
* बोलणाऱ्याला मध्येच थांबवू नका. त्याचे बोलणे पूर्ण होण्याची वाट पाहा.

कामगिरी उत्तम व्हावी म्हणून..
* चर्चेदरम्यान इतरांचे वक्तव्य काळजीपूर्वक ऐका आणि नंतरच तुमची प्रतिक्रिया द्या किंवा त्या मुद्दय़ांच्या आधारे आपले म्हणणे मांडा. त्यावरून तुमची सांघिकवृत्ती दिसून येते.
* चर्चेसाठी दिलेल्या विषयाबाबत तुम्हाला विविधांगी माहिती असणे अपेक्षित असते. समस्येवर उपाय योजताना तुमच्या संकल्पना सृजनशील असणे महत्त्वाचे.
* गटचर्चेदरम्यान कोणालाही वैयक्तिक पातळीवर संबोधू नये. तुमचे बोलणे हे सर्व गटाला उद्देशून हवे. बोलताना औपचारिक भाषेचा वापर करा. तुमचा आवाज सर्वात दूर बसलेल्या व्यक्तीलाही नीट ऐकू येईल, असा असावा.

सारांश काढताना पुढील मुद्दे लक्षात ठेवा-
* नवे मुद्दे मांडू नका.
* फक्त तुमचे मुद्दे मांडू नका. इतरांच्या मुद्दय़ांनाही स्थान द्या.
* एकाच दृष्टिकोनातून पाहू नका.
* संक्षिप्त स्वरूपात म्हणणे मांडा.
* सारांश मांडून पूर्ण झाले की, नंतर पुन्हा जोडमुद्दे मांडू नका.

गटचर्चेचे प्रकार
* विषयावर आधारित गटचर्चा- याचे दोन प्रकार असतात-
(अ) वस्तुस्थितीवर आधारित विषय- हे विषय सर्वसामान्यांच्या माहितीतले असतात. हे विषय सामाजिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान इत्यादी क्षेत्रांशी निगडित असतात.
(ब) वादग्रस्त विषय- विषयावरूनच लक्षात येते, की यात एकमत असू शकत नाही. या विषयावर चर्चा करताना मुद्दा न पटल्याने आवाजाची पातळी वाढू शकते. मात्र, त्यावेळी तुम्ही स्वत:वर नियंत्रण राखत तार्किकदृष्टय़ा तुमचे म्हणणे कसे मांडता, याचे निरीक्षण पॅनेलमधील तज्ज्ञ करतात.
* केस-स्टडीवर आधारित गटचर्चा- यात विषयाऐवजी एखाद्या प्रसंगावर अथवा घटनेवर आधारित चर्चा केली जाते. यामध्ये परिस्थितीची माहिती देऊन ग्रुपला त्यावरील समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले जाते.

निरीक्षण आणि सराव
गटचर्चेमधील आपली कामगिरी उत्तम होण्याकरता अधिकाधिक सराव करणे उपयुक्त ठरेल. त्यासाठी वेगवेगळ्या परिसंवादांना उपस्थित राहा तसेच मित्रांचा ग्रूप बनवून त्यात गटचर्चेचा सराव करा. इतर वक्ते अथवा ग्रूपमधील इतर विद्यार्थी आपल्या प्रतिक्रिया काळजीपूर्वक आणि निष्पक्षपातीपणे कशा व्यक्त करतात, प्रश्न कसे उपस्थित करतात, एखाद्या मुद्दय़ाशी सहमती-असहमती कशी दर्शवतात याचे सखोल निरीक्षण करा.
गटचर्चेच्या सरावामुळे वेगवेगळ्या विषयांवर विचार करण्याची सवय जडते. समोरची व्यक्ती आपले मुद्दे कसे मांडते, त्या मुद्दय़ांचे शांतपणे खंडन करून आपल्याला आपला मुद्दा कसा रेटता येईल, याचा सराव होतो. शक्य तितक्या औपचारिक-अनौपचारिक चर्चासत्रांमध्ये सहभागी झाल्याने समूहात आपले म्हणणे
आत्मविश्वासाने मांडण्याची सवय होईल.

सुरुवात व शेवट
* गटचर्चेत प्रारंभी बोलणे हे जसे लाभदायक असते, तसेच ते प्रभावी न झाल्यास त्याचा फटकाही बसू शकतो.
* माहितीपूर्ण संभाषणकौशल्याने तुम्ही सुरुवातीलाच अनुकूल छाप पाडलीत तर उत्तमच. मात्र, जर तुम्ही सुरुवात भीत भीत वा चुकीचे दाखले देत केलीत तर त्यामुळे न भरून येणारे नुकसान होईल.
* तुम्ही चर्चेला सुरुवात करत असाल तर ते बोलणे अचूक आणि नेमके असावे. उगाचच बोलणे लांबवू नका. जर तुम्हाला दिलेल्या विषयाचे सखोल ज्ञान असेल आणि पुरेसा आत्मविश्वास असेल तरच चर्चेची सुरुवात करा.
* अनेकदा गटचर्चेच्या शेवटी एकमत होत नाही. खरे पाहता एकमत होणे अपेक्षितही नसते. परंतु, प्रत्येक गटचर्चेच्या शेवटी सारांश मांडण्याची संधी तुम्हाला साधता येईल. त्यात मांडण्यात आलेल्या विविध मुद्दय़ांचा उल्लेख जरूर करा.

* चच्रेला सुरुवात करण्यापूर्वी सोबतच्या उमेदवारांची नावे जाणून घ्या आणि चच्रेदरम्यान इतरांना नावाने संबोधा.
* आत्मविश्वासाने आणि सुहास्य मुद्रेने मतप्रदर्शन करा.
* आपली मते मांडताना ती मुद्देसूद, विषयाला धरून, समर्पक आणि तर्कसुसंगत असणे गरजेचे आहे.
* स्वत:ची कामगिरी उंचावण्यासाठी आपण मांडत असलेले मुद्दे इतर उमेदवारांकडून खोडले जाणे स्वाभाविक आहे. परंतु, त्यामुळे निराश होऊन माघार घेऊ नका किंवा आक्रस्ताळी भूमिकेत शिरू नका. अशा वेळी सौम्यपणे आपला दृष्टिकोन पुढे रेटत राहणे अपेक्षित असते. कारण गटचच्रेत कोणाची हार-जीत अपेक्षित नसून एकत्रित सहभागाने शेवटपर्यंत विचारमंथन पुढे सरकवत ठेवणे हा गटचर्चेचा अंतिम हेतू असतो.
* प्रत्येक वेळी दुसऱ्या उमेदवारांची मते नाकारल्याने निरीक्षकांच्या मनात आपली प्रतिमा नकारात्मक होऊ शकते. इतरांच्या विचारांवर आक्षेप घेताना थेट नकारात्मक न बोलता, प्रश्नार्थक विधाने करून किंवा अंशत: विरोध दर्शवून स्वत:चे मत मांडणे योग्य ठरते.
* कोणत्याही विषयावर समूहात मतप्रदर्शन करताना जातिवाचक, धर्मवाचक, िलगवाचक विधाने हेतुपुरस्सर टाळणे इष्ट ठरते.
* वाद-प्रतिवादाने चच्रेतील वातावरण तंग झाले असेल तर विषयाला धरून काही हलकीफुलकी विधाने, नर्मविनोद किंवा शाब्दिक कोटय़ा करून चच्रेत प्रसन्नता आणण्याचा प्रयत्न करा. यातून आपली विनोदबुद्धी, चलाखी आणि शांतताप्रिय मनोवृत्ती दिसून येईल.
* चच्रेत मतप्रदर्शन करताना सहभागी असलेल्या सर्वाकडे बघून बोलणे गरजेचे आहे. तसेच चच्रेत फारसा सहभाग घेत नसलेल्या एखाद्या सदस्याला उद्देशून, विषयाशी निगडित प्रश्न विचारून त्याला बोलण्यासाठी उद्युक्त करण्याचे कसबही प्रसंगी दाखवणे आवश्यक ठरते. यातून आपली सांघिक वृत्ती दिसून येते.
* स्वत:च्या मतांबद्दल आग्रही असणे योग्यच, पण विचारप्रदर्शनात कोठेही आततायीपणा जाणवायला नको. बोलताना आपल्या आवाजाची पट्टी, हातवारे, पायांची हालचाल, बसण्याची पद्धत सर्व काही संयमित असावे.
* काही उमेदवारांना इंग्रजीतून अस्खलित संवाद साधणे कठीण जाते. मात्र, हा न्यूनगंड बाळगत गप्प बसू नका. जमेल तितका इंग्रजीतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा.
* विषयांतर टाळण्यासाठी हजरजबाबीपणाने चच्रेला मूळ मुद्दय़ाकडे नेण्याचा प्रयत्न करा.