भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बाबा एन. कल्याणी यांना प्रतिष्ठेच्या ‘सह्य़ाद्री रत्नवैभव २०१५’ पुरस्काराने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रात कतृत्व गाजवणाऱ्या कीर्तिवंतांसाठी मुंबई दूरदर्शनच्या सह्य़ाद्री वाहिनीतर्फे हा वार्षिक पुरस्कार सोहळा योजण्यात येतो. गुरुवारी सायंकाळी अनेक उद्योगपती, राजकीय नेते, क्रीडा-कला-सामाजिक क्षेत्रातील नामवंतांच्या उपस्थितीत रवींद्र नाटय़मंदिर सभागृहात पार पडलेल्या समारंभात कल्याणी यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी या पुरस्काराचे मानकरी भारतरत्न सचिन तेंडुलकर, अजित गुलाबचंद, धनराज पिल्ले यासारखे कीर्तिवंत मानकरी ठरले आहेत.