येत्या मंगळवारी अक्षय्य तृतीयेनिमित्त भांडवली बाजारातील गोल्ड ईटीएफसाठी होणाऱ्या व्यवहारांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजार- ‘बीएसई’ आणि ‘एनएसई’वर गोल्ड ईटीएफसाठी २१ एप्रिल रोजी सायंकाळी ७ पर्यंत खरेदी-विक्री करता येणार आहे. सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० पर्यंत नियमित व्यवहार झाल्यानंतर गोल्ड ईटीएफचे व्यवहार सायंकाळी ४.३० ते ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. यासाठी मुंबई शेअर बाजाराने या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, कोटक, रिलायन्स आदी कंपन्यांचे ईटीएफ बाजारात आहेत.