प्रमुख क्षेत्राची खुंटलेली वाढ ऑक्टोबरमध्ये कायम चिनी अर्थव्यवस्थेला मागे टाकले मंदावलेल्या चिनी अर्थव्यवस्थेला मागे टाकताना चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीतील ७.४ टक्के विकास दर गाठणारा टप्पा भारताने अखेर गाठला आहे. जुलै ते सप्टेंबर २०१५ मध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे नोंदले गेले आहे. २०१५-१६ या चालू आर्थिक वर्षांतील विकास दर ७ टक्क्य़ांवर स्थिरावला होता. मात्र निर्मिती, खनिकर्म तसेच सेवा क्षेत्राच्या वाढीच्या वाढीच्या जोरावर देशाने यंदा एकूण विकास दरात लक्षणीय वाढ राखली आहे. सात टक्क्य़ांखालची चीनची अर्थव्यवस्था ६.९ टक्क्य़ांवर विसावली आहे. तर रशिया ४.१ टक्के व ब्राझील ४.२ टक्के दराने प्रवास करत आहे. अन्य महत्त्वाच्या विकसनशील देशांची ही प्रगती असताना भारताना या साऱ्या देशांना मागे टाकले आहे. तमाम उद्योग तसेच वित्त क्षेत्राला देशाच्या विद्यमान आर्थिक स्थितीविषयक ताज्या आकडेवारीची प्रतिक्षा होती. व्यापार, आदरातिथ्य व्यवसाय, दळणवळण तसेच सेवा क्षेत्रातील प्रगतीच्या जोरावर भारताला यंदा ७ टक्क्य़ांपुढील विकास वेग राखता आला आहे. सरकारचे चालू एकूण आर्थिक वर्षांसाठीचे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे लक्ष्य ८.१ ते ८.५ टक्के आहे. दुसऱ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ ९.३ टक्क्य़ांवर गेली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ७.९ टक्के होती. तर खनिकर्म क्षेत्राची वाढ यंदा वर्षभरापूर्वीच्या १.४ टक्क्य़ांवरून दुपटीहून अधिक, ३.२ टक्के झाली आहे. मंदावलेल्या क्षेत्रामध्ये वित्त, स्थावर मालमत्ता, व्यावसायिक सेवा यांचा समावेश आहे. ते वर्षभरापूर्वीतील दुहेरी आकडय़ांवरून (१३.५ टक्के) यंदा काठावर (९.७%) आले आहे. तसेच वायू, पाणी पुरवठा व अन्य सेवा क्षेत्रेही ६.७ टक्क्य़ांपर्यंत घसरली आहेत. बांधकाम क्षेत्रही ८.७ टक्क्य़ांवरून केवळ २.६ टक्क्य़ांपर्यंतच जाऊ शकले आहे. कमी मान्सून असूनही कृषी व निगडित क्षेत्राची वाढ किरकोळ वाढली आहे. ती २.१ टक्क्य़ांवरून यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत २.२ टक्के झाली आहे. रकमेमध्ये सकल राष्ट्रीय उत्पादन दुसऱ्या तिमाहीत २७.५७ लाख कोटी रुपये अंदाजित केले तर २०१४-१५ या संपूर्ण आर्थिक वर्षांत ते २५.६६ लाख कोटी रुपये होते. घसरता औद्योगिक उत्पादन दर, खुंटलेला विकास दर तसेच आर्थिक सुधारणांना मिळत नसलेली गती या पाश्र्वभूमीवर सोमवारी जाहीर झालेला वाढीचा देशाचा विकास दर अर्थव्यवस्थेच चैतन्य निर्माण करणारा असल्याची भावना निवडक उद्योग संघटनांच्या व्यासपीठांनी व्यक्त केली आहे. वस्तू व सेवा कर विधेयकाच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न प्रतिक्षेत असतानाच आता रिझव्र्ह बँकेमार्फत व्याजदर कपातीद्वारे हातभार लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. देशातील प्रमुख आठ सेवा क्षेत्राची खुंटलेली वाढ यंदाच्या ऑक्टोबरमध्येही कायम राहिली आहे. प्रामुख्याने खनिज तेल व स्टील उत्पादन रोडावल्याने या कालावधीत हे क्षेत्र ३.२ टक्क्य़ांइतकेच विकसित झाले आहे. आधीच्या, सप्टेंबरमध्येही या क्षेत्राचा प्रवास याच दरम्यान होता. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादन क्षेत्रात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण केलेली उत्पादने, खते, स्टील, सिमेंट व ऊर्जा या क्षेत्राचा हिस्सा ३८ टक्के आहे. ही क्षेत्रे वर्षभरापूवी, ऑक्टोबर २०१४ मध्ये ९ टक्क्य़ांनी वाढली होती. चालू आर्थिक वर्षांतील एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान प्रमुख क्षेत्रे २.५ टक्क्य़ांनी वाढली आहेत. ही वाढ वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ५.६ टक्के वाढीच्या तुलनेत निम्मी आहे. प्रमुख आठ क्षेत्रापैकी खनिज तेल, नैसर्गिक वायू, स्टील उद्योग क्षेत्राने यंदाच्या ऑक्टोबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदविली आहे. व्याजदर कपातीचा निर्देशाक प्रतिसाद नाहीच सप्टेंबर २०१५ नंतरच्या अर्धा टक्का व्याजदर कपातीनंतर मुंबई शेअर बाजारातील व्याजदराशी निगडित निर्देशांकांमध्ये फारशी उत्साहवर्धक हालचाल नोंदविली गेली नाही. स्थावर मालमत्ता, बँक, वाहन निर्देशांकांमध्ये दोन महिन्यात घसरणच नोंदली गेली आहे. उलट अन्य घडामोडींमुळे ग्राहकपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञानसारख्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ नोंदली गेली आहे. स्थावर मालमत्ता -१७.०२% बँक -८.६४% भांडवली वस्तू -७.१६% वाहन -०.१९% (२९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर २०१५ दरम्यान निर्देशांक प्रवास) मंगळवारच्या पतधोरणार रिझव्र्ह बँक तिचे प्रमुख दर ६.७५ टक्के या प्रमाणावरच कायम ठेवण्याची अधिक शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची अमलबजावणी तसेच पुढील ग्राहक किंमत निर्देशांकावरील महागाईचा दर पाहूनच दर कपातीचे पाऊल आगामी कालावधीत उचलले जाईल. - डीबीएस ग्रुपच्या अहवालातील मत. वाहन कंपन्यांचे समभाग मूल्य वेगावर स्वार दिवाळीसारख्या सणाच्या महिन्यात वाहन उद्योगाला मिळालेल्या प्रतिसादातील तथ्य नोव्हेंबरमधील विक्री आकडय़ातून मंगळवारी समोर येण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात नरमाई असताना या क्षेत्रातील समभागांना मात्र भाव मिळवून दिला. मुंबई शेअर बाजारातील महिंद्र अॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स, बजाज ऑटोसारख्या कंपन्यांचे समभाग १.४१ टक्क्य़ांपर्यंत वाढले. सत्रात या क्षेत्रातील समभाग दोन टक्क्य़ांपर्यंत उंचावले होते. मारुती सुझुकी व हीरो मोटोकॉर्प या अनुक्रमे प्रवासी चारचाकी व दुचाकी निर्मितीतील कंपन्यांचा समभाग प्रवास स्थिर राहिला. अशोक लेलॅण्डला ३.०८ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले. महिंद्र अॅन्ड महिंद्र रु. १,३६७.२५ (+१.४१%) टाटा मोटर्स रु. ४२३.३५ (+१३९%) बजाज ऑटो रु. २,४८१.५५ (+१.३४%) आयशर मोटर्स रु. १६,७२३.४० (+०.९४%) टीव्हीएस मोटर्स रु. ३०६.९० (+०.४७%) फोर्स मोटर्स रु. ३,३०८ (+३.७८%) फेड बैठक तसेच भारतात वस्तू व सेवा कर विधेयकाचा तिढा सुटण्याच्या आशेवर बाजाराने सकारात्मक प्रवास केला आहे. - जिओजित बीएनपी पारिबास फाय.सव्र्हि.चे विनोद नायर.