मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सन २०१२-१३ या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकासदर हा पाच टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २००२-०३ या आर्थिक वर्षानंतर पहिल्यांदाच विकासदर इतका खाली येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षात विकासदर ५.५ टक्के राहील, असा अंदाज गेल्या महिन्यात वर्तविण्यात आला होता. मात्र, सुधारित अंदाजानुसार तो आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. भारताचा कृषी उत्पादनाचा दर १.८ राहण्याची आणि उत्पादन दर १.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याचाही परिणाम विकासदरावह दिसणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षांमध्ये विकासदर ६.२ टक्के राहिला होता. मात्र, चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्रीय अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बॅंकेने यापूर्वी वर्तविलेले सर्व अंदाज चुकण्याची शक्यता अधिक आहे.
चालू आर्थिक वर्षात एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) घट होण्याचा अंदाज होताच. मात्र, वाहतूक, दळणवळण, हॉटेल, व्यापार आदी सेवाक्षेत्रांमधील उत्पन्नात अपेक्षेपेक्षा जास्त घट झाल्याचा परिणाम विकासदरावर होईल, असे मत आयएनजी वैश्य बॅंकेच्या अर्थसल्लागार उपासना भारद्वाज यांनी व्यक्त केले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















