कर्जपातळीबाबत चिंतेतून निती आयोगाची शिफारस

सार्वजनिक नागरी हवाई सेवा कंपनी एअर इंडियावरील कर्जाची पातळी ही मुळीच शाश्वत नसून तिचे खासगीकरण आवश्यकच आहे, असे आपल्या शिफारशीचे समर्थन निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी गुरुवारी केले. केंद्र सरकार एअर इंडियाचे भवितव्य येत्या सहा महिन्यात ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

Vasai, Solar power, subsidy scheme,
वसई : सौर उर्जा अनुदानाची योजना कागदावरच, ६ वर्षांपासून एकालाही अनुदान नाही
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
SBI, electoral bonds, confidential,
एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय
ntpc and shipping corporation disinvestment
एनटीपीसी, शिपिंग कॉर्पोरेशनच्या निर्गुंतवणुकीला सर्वोच्च प्राधान्य, निवडणुकीनंतर १०० दिवसांच्या कालावधीत भागविक्री शक्य

सुमारे ५२,००० कोटी रुपयांचा कर्जभार असलेल्या एअर इंडियाच्या खासगीकरणाची शिफारस निती आयोगाने केली आहे. कंपनीवरील कर्जभारात वर्षांला ४,००० कोटी रुपयांची भर पडत असल्याचेही ते म्हणाले.

एअर इंडिया खासगीकरणासह अनेक पर्याय चाचपडून पाहत असल्याचे नमूद करत पानगढिया यांनी कंपनीसाठी काही खासगी कंपन्या उत्सुक असल्याचे म्हटले आहे. एअर इंडियामधील मोठा हिस्सा खरेदी करण्यास टाटा समूहाचे अध्वर्यू रतन टाटा उत्सुक असल्याची चर्चा आहे. पानगढिया यांनी मात्र याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. एअर इंडिया आता खासगी उद्योगांच्या हातात देणेच योग्य ठरेल, एवढेच निती आयोगाचे उपाध्यक्ष पानगढिया म्हणाले.

एअर इंडियाचे खासगीकरण येत्या सहा महिन्यात होऊ शकेल, असे संकेत त्यांनी दिले. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी, मार्च २०१८ पर्यंत याबाबतची प्रक्रिया पूर्ण करता येईल, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसात याबाबत सरकारकडून पावले टाकली जातील, असेही ते म्हणाले.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दुसऱ्या टप्प्यातील सरकारच्या कालावधीत एअर इंडियाला ३०,००० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले होते. विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबत यापूर्वीच समर्थन व्यक्त केले आहे.