विक्रीकर विभागाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देऊन कंपनीचा धनादेश परत पाठविण्यात संबंधित बँक तसेच व्यापाराची चूक असल्याचे विक्रीकर विभागाने स्पष्ट केले आहे.
‘लोकसत्ता’त ८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘विक्रीकर विभागाची वट नाही’ या वृत्ता संदर्भात स्पष्टीकरण करताना विभागाने संबंधित धनादेशामागे कंपनीचा शिक्का व सही असावयास हवा, असे म्हटले आहे. तसेच बँकेने दिलेले ‘खात्यात पुरेशी रक्कम नसल्याचे’ कारण चुकीचे असल्याचा दावाही केला आहे.
दरम्यान, याबाबत कंपनीने असे शिक्का व सही करण्याबाबतचे कोणतेही निर्देश नसल्याचे म्हटले आहे; तर बँक अद्याप ही बाब तपासत आहे.