निवृत्तीपश्चात जीवनाची तजवीज म्हणून उपलब्ध विविध गुंतवणूक पर्यायांपेक्षा ‘नवीन पेन्शन योजना (एनपीएस)’ अनेकांगाने सरस असल्याचे आपण लेखाच्या पूर्वार्धात (अर्थवृत्तान्त, १३ ऑक्टोबर २०१४) पाहिले. देशातील कामगारवर्गाच्या सुमारे ९० टक्के हिश्श्यासाठी उत्तर आयुष्यातील आर्थिक स्वावलंबन ठरणाऱ्या  या योजनेत अगदी निरक्षर शेतमजूर आणि कोणत्याही बँकेत खाते नसलेल्या वंचितालाही सहभागी होता येईल, कसे ते सांगणारा उत्तरार्ध..
मागील लेखात नवीन पेन्शन योजनेत (एनपीएस) टियर वन खाते कसे उघडले जाते, हे जाणून घेतले आणि त्यातील दुसरा प्रकार म्हणजे टियर टू खात्याकडे वळू या. तथापि टियर टू योजनेची माहिती जाणून घेण्याआधी या योजनेचा कारभार कसा चालतो ते पाहू.
सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (सीआरकीए)
नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लि. (एनएसडीएल) या शेअर्ससाठीच्या डिपॉझिटरी संस्थेच्या उपकंपनीमार्फतच याचे व्यवहार पाहिले जातात. या संस्थेची पेन्शन प्राधिकरणाने केंद्रीय माहिती जपणारी / सांभाळणारी संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. आपले डिमॅट खाते ज्याप्रमाणे कोणत्याही संस्थेत असले तरी त्याचे व्यवहार पाहणारी व आपल्या शेअर्सचा ताबा ठेवणारी संस्था ही एनएसडीएल किंवा सीडीएसएल ही असते, त्याचप्रमाणे पेन्शन खाते या एनएसडीएलमार्फत सांभाळले जाते. त्यांच्यामार्फत तुमच्या पेन्शन खात्यास विशिष्ट नंबर देण्यात येतो. ढफअठ हा नंबर कायमस्वरूपी एकमेवाद्वितीय (युनिक) असतो. आपण आपले खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत बदली केल्यावर हा नंबर बदलत नाही. तुमच्या खात्याबाबत संपूर्ण माहिती खालील वेबसाइटवर मिळते. ँ३३स्र्२://६६६.ल्लस्र्२ू१ं.ल्ल२’ि.ू.्रल्ल,
आपण खाते भारतात कोठेही बदली करू शकतो. उदा. आपण मुंबईत खाते एका बँकेत उघडले असेल व तुमची बदली दिल्लीत झाल्यास दुसऱ्या बँकेच्या तेथील शाखेत तुम्ही खाते फिरवू शकता. वरील वेबसाइटवर सर्व संस्थांच्या सर्व योजनांचे नक्त मालमत्ता मूल्य- एनएव्ही समजते. त्यानुसार आपण वर्षांतून एकदा आपले निधी व्यवस्थापक बदलू शकता. सर्व व्यवहारासांठी एसएमएस व ई-मेलद्वारे त्वरित माहिती मिळते. आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीत म्हणजे अॅक्टिव्ह किंवा स्वयंचलित (ऑटो) पर्यायात वर्षांतून एकदा बदल करता येतो.
इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेप्रमाणेच याचे केवायसी नियम आहेत; परंतु पॅनकार्ड आवश्यक असल्याचे नमूद केलेले नाही. एका व्यक्तीस एकच खाते उघडता येते. दरवर्षी किमान ६,००० रुपये न भरल्यास खाते गोठवले जाते व पुढील वर्षी १०० रुपये दंड भरून पुन्हा कार्यान्वित करता येते.
या खात्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही नोकरी करत असलेली संस्थासुद्धा या तुमच्या खात्यात रक्कम भरू शकते. ही रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या (बेसिक+डीए) च्या १०% पर्यंत व दीड लाख रुपये (८० क) मर्यादेत असल्यास तुम्हास त्यावर आयकर द्यावा लागत नाही व संस्थेसही रक्कम १००% खर्चात दाखवता येते. कंपन्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाव्यतिरिक्त हे खाते असल्याने काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या उत्तेजनार्थ रकमेचा काही भाग या खात्यात वर्ग करतात म्हणजे त्या रकमेवर कर्मचाऱ्यांना आयकर भरावा लागत नाही.
मुदतपूर्तीच्या वेळेस खाते चालू नसेल किंवा गोठवलेले असेल तर खाते फी भरून कार्यान्वित केल्यावरच रक्कम काढता येते. किंवा फी कापून रक्कम हातात येते.

टियर टू खाते
हे खाते टियर वन खाते असल्याशिवाय उघडता येत नाही. उघडले पाहिजेच अशी सक्ती नाही. खाते उघडल्यास दरवर्षी कमीत कमी २,००० रुपये भरावे लागतात. टियर वन खात्यातली रक्कम निवृत्त होईपर्यंत किंवा ६० वष्रे पूर्ण होईपर्यंत काढता येत नाही. याउलट टियर टूमधील रक्कम कधीही काढता येते. टियर वन खाते गोठवले गेले असल्यास ते कार्यान्वित झाल्याखेरीज टियर टू खाते उघडता येत नाही.
खाते उघडण्यासाठी किंवा खाते कार्यान्वित ठेवण्यासाठी वार्षकि फी (एएमसी शुल्क) आकारली जात नाही; परंतु इतर सर्व व्यवहारांसाठी फी आकारली जाते (टियर वन खात्याप्रमाणेच). वर्षभरात किती वेळा रक्कम काढता येईल याला मर्यादा नाही. टियर टू (बचत खाते) मधून टियर वन (पेन्शन खाते) मध्ये रक्कम हस्तांतरित करता येते; परंतु याच्या उलटे म्हणजे टियर वनमधून टियर टू ए करता येत नाही. स्वतंत्र ‘केवायसी’ची गरज नाही. टियर टूमधील रक्कम कधीही काढली तरी त्यावर निर्गमन शुल्क (एग्झिट लोड) लागत नाही. टियर वन खाते उघडताना तुमच्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक नाही (कारण रक्कम काढता येत नाही). परंतु टियर टू खाते उघडताना माहिती आवश्यक आहे, कारण रक्कम काढल्यास चेक न मिळता रक्कम खात्यात जमा होते.
टियर वन आणि टियर टू खात्यांसाठी स्वतंत्र निधी व्यवस्थापन संस्था निवडता येते. दोन्ही खात्यांस स्वतंत्र नॉमिनेशन करता येते. एका खात्यास तीन नॉमिनी ठेवता येतात. खाते उघडताना नॉमिनेशन करण्यासाठी फी आकारली जात नाही; परंतु नंतर नॉमिनेशन बदलासाठी सेवा शुल्क २० रुपये अधिक सेवा कर आकारले जाते. तुमचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक आपल्या प्रत्येक व्यवहारासाठी सेवा शुल्क आकारते. रक्कम भरणे, खात्याचा तपशील मागणे, खात्यावर जमा रक्कम किंवा गुंतवणुकीची कामगिरी व एनएव्हीचा ताळेबंद वगैरे कोणत्याही व्यवहारासाठी/ तपशिलासाठी फी आकारली जाते.
निवृत्तीनंतर टियर टू खात्यातील रक्कम आयुर्वमिा कंपन्यांच्या निवृत्ती योजनात गुंतविणे सक्तीचे नाही; परंतु टियर वनमधील कमीत कमी ४०% रक्कम गुंतविणे सक्तीचे आहे.
खालील आयुर्वमिा कंपन्यांच्या पेंशन योजनात गुंतवणूक करता येते-
१. भारतीय आयुर्वमिा महामंडळ (एलआयसी)
२. एसबीआय लाइफ इन्शुरन्स
३. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स
४. बजाज अलियान्झ
५. स्टार-युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्स
६. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स
७. रिलायन्स लाइफ इन्शुरन्स
वरीलपकी पर्याय न निवडला गेल्यास सुयोग्य पर्याय (डिफॉल्ट ऑप्शन) आयुर्वमिा महामंडळ ठरविला जातो.
पुढील लेखात आयुर्वमिा महामंडळाची एक चांगली पेन्शन योजना विचारात घेऊ.
(लेखक ‘सेबी’कडे नोंदणीकृत
गुंतवणूक सल्लागार आहेत)
‘एनपीएस’मध्ये मासिक पेन्शन खालील पर्यायात घेता येते-
१. आयुष्यभर स्थिर रक्कम मिळणे
२. वार्षकि ३% वाढीने आयुष्यभर मासिक रक्कम मिळणे
३. पेन्शन ५, १०, १५ किंवा २० वष्रे नक्की व पुढे तुम्ही जिवंत असेपर्यंत (म्हणजे तुमच्यापश्चात २० वष्रेपर्यंत वैवाहिक जोडीदारास व नंतर नाही)
४. आयुष्यभर पेन्शन व मृत्यूपश्चात वैवाहिक जोडीदारास मूळ रक्कम मिळते.
५. आयुष्यभर पेन्शन व मृत्यूपश्चात वैवाहिक जोडीदारास ५०% पेन्शन
६. आयुष्यभर पेन्शन व मृत्यूपश्चात वैवाहिक जोडीदारास १००% पेन्शन
७. आयुष्यभर पेन्शन व मृत्यूपश्चात वैवाहिक जोडीदारास १०० पेन्शन व नंतर वारसांस मूळ रक्कम परत.
पर्याय १, २, ३, ५ आणि ६ मध्ये मूळ भरलेली रक्कम परत मिळत नाही म्हणून दरमहा मिळणारी रक्कम ४ आणि ७ पर्यायांपेक्षा जास्त असते. (मूळ रक्कम थोडय़ा प्रमाणात दरमहा व्याजाबरोबर वाटल्यामुळे) पेन्शनचा प्रकार निवडला नसेल, तर सुयोग्य पर्याय सहावा ठरविला जातो. पेन्शन दरमहा खात्यात जमा होते.
या योजनेत प्रत्येक वेळेस सुयोग्य पर्याय (डिफॉल्ट ऑप्शन) हा ‘सर्वोत्तम चांगला पर्याय’ असे सुचवण्याचा हेतू नियामक प्राधिकरणाचा नसून पर्याय न निवडल्यामुळे गुंतवणूकदार योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नये हा आहे.
वाचकांचा अभिप्राय..
पहिला लेख वाचल्यावर खूप वाचक बँकेत जाऊन आले किंवा त्यांच्या रिलेशनशिप मॅनेजरला फोन करून या योजनेची माहिती विचारली. बहुतेकांचा अनुभव उत्साहवर्धक नव्हता.
काही वाचकांचे प्रश्न विचारात घेऊ या-
१ नाशिकवरून नितीन बाविस्कर विचारतात की, खाते उघडण्यासाठी कर परतावा (आयटी रिटर्न्स) दरवर्षी भरणे आवश्यक आहे का? परताव्याची पावती अर्जासोबत जोडावी लागते का?
– हे खाते उघडण्यासाठी पॅन कार्डचीही गरज नाही. अशिक्षित शेतमजूरसुद्धा हे खाते उघडू शकतो. बँक खाते असण्याचीसुद्धा आवश्यकता नाही. रोख रक्कमसुद्धा भरता येते. (म्हणजे ५०,००० रुपयांच्या आत)
२ देवदत्त धानोकर विचारतात की, ६० वष्रे पूर्ण झाल्यावर पेन्शन घेणे पुढे ढकलता येते का?
– ६० वष्रे पूर्ण झाल्यावर त्यात रक्कम भरता येत नाही; परंतु पेन्शन घेणे तीन वष्रे पुढे नेता येते.
३ सुजाता एस. असे विचारतात की, पूर्वी केंद्र सरकार हे खाते उघडणाऱ्यांस १,००० रु. प्रोत्साहन म्हणून देत असे, ते मिळाले नाही तर काय करावे?
– हे १,००० रु. तुमच्या टियर वन खात्यात जमा होतात. तुम्हास रोख मिळत नाहीत. जमा झाले नसल्यास तुमच्या या खात्यासाठीच्या बँकेत चौकशी करावी.
४ अजय जी. विचारतात की, खाते ५८ व्या वर्षी उघडले, तर दोन वर्षांत बंद करता येते का?
– कोणत्याही वर्षी उघडले तरी वय वर्षे ६० पूर्ण झाल्यावर खाते बंद करता येते.
५ विवेक कुलकर्णी विचारतात- परदेशस्थ भारतीयांसाठी नियम वेगळे आहेत का?
– नियम वेगळे नाहीत; परंतु गुंतवणूक ‘फेमा’ कायदा व रिझव्र्ह बँकेच्या नियमानुसार करावी लागते.