सततच्या नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून करंजा येथील शेतकरी विनायक गोरख गोरे (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अमोल गोरे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करंजा येथील विनायक गोरे यांना ३ एकर शेती आहे. मात्र सततच्या नापिकीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. डोक्यावर झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या प्रश्नाने ते निराश होते. या नराश्यातून त्यांनी शुक्रवारी राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना विनायक गोरे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गोरे यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी, मुलगा, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे