नारायण राणे यांनी साथ सोडल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादेत मांडले. सिंधुदुर्ग जिल्हयात राणे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. नारायण राणे जुने मित्र असल्यामुळे राजकीय निर्णय घेताना ते माझ्याशी चर्चा करतात असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाची नेमकी दिशा ठरवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी किसान सेलची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरेंनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सरकारच्या दिंरगाईमुळेच शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारने शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली. तीन महिन्यानंतरही या योजनेच्या लाभार्थी संदर्भातील माहिती दिली जात नाही. ज्यावेळी शेतकऱ्याच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, त्यावेळी सरकारची योजना फसवी असल्याचे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane out of party this is big loss of congress says sunil tatkare
First published on: 04-10-2017 at 21:56 IST