आजच्या लेखामध्ये आपण आíथक आणि सामाजिक विकास या घटकावर गतवर्षीय परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊ. तसेच या घटकाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, तसेच कोणते संदर्भ साहित्य वापरावे याची चर्चा करणार आहोत. मागील लेखामध्ये आपण या घटकाचे स्वरूप कसे आहे याची माहिती घेतली आहे. आजच्या लेखात आपण या घटकातील शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी नमूद मुद्दय़ांवरील गतवर्षीय पूर्व परीक्षांमध्ये (२०११-२०१६) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा आधी घेऊ या.

२०११मध्ये, ‘खालीलपकी कोणी सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाला साहाय्यकारी ठरू शकते?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि खालील तीन विधाने देण्यात आलेले होती आणि यातील योग्य विधान / विधाने कोणती हे ओळखून पर्याय निवडायचा होता.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
t plus zero settlement system marathi news, what is t plus zero settlement in marathi
विश्लेषण: आजच व्यवहार, आजच सेटलमेंट… शेअर बाजाराच्या T+0 प्रणालीचे आणखी कोणते फायदे?
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

(१) स्वयं साहाय्यता बचत गटाचा प्रसार.

(२) सूक्ष्म, छोटी आणि मध्यम उपक्रम प्रसार

(३) शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी

हा प्रश्न थेट सर्वसमावेशक वाढीशी संबंधित आहे. या प्रश्नाचे स्वरूप जरी वस्तुनिष्ठ वाटत असले तरी सर्वसमावेशक वाढ या धोरणाची योग्य माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देणे कठीण जाते. उपरोक्त सर्व विधाने ही स्वतंत्र स्वरूपाची वाटतात, त्यामुळे सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना नेमकी काय आहे? याचे प्रकार अथवा वैशिष्टय़े कोणती आहेत? याच्यामध्ये सरकारच्या कोणत्या ध्येयधोरणांचा अंतर्भाव होतो याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. याचे उत्तर ‘वरील सर्व विधाने’ असे आहे. कारण सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या धोरणाचा मुख्य उद्देश समाजातील विकासापासून दूर असलेल्या सामान्य आणि वंचित घटकाचे आíथक आणि सामाजिक सक्षमीकरण करणे हा आहे आणि ही तिन्ही विधाने आíथक आणि सामाजिक सक्षमीकरण साध्य करण्यासाठी साहाय्यभूत ठरतात. थोडक्यात सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना गरिबी निर्मूलन, उत्तम आरोग्य सेवा, सर्वासाठी प्राथमिक शिक्षण तसेच उच्च शिक्षणामध्ये वाढ करणे, कौशल्य विकास, आíथक समावेशन, शाश्वत विकास इत्यादीशी संबंधित आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे आकलन करणे गरजेचे आहे.

२०१२मध्ये, “Oxford Poverty and Human Development Initiativeच्या मदतीने विकसित केलेल्या बहुआयामी दारिद्रय़ निर्देशांक (Multi Dimensional Poverty Index) यामध्ये खालीलपकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी तीन विधाने देण्यात आलेली होती. व यातील योग्य विधान/विधाने कोणती याची निवड करून पर्याय निवडायचा होता.

(१)घरपोच शिक्षण, आरोग्य, मालमत्ता आणि सेवा यापासून वंचित.

(२)राष्ट्रीय स्तरावरील क्रयशक्ती साम्य

(३)राष्ट्रीय स्तरावरील तुटीच्या अर्थसंकल्पाचे प्रमाण आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर

या प्रश्नाचे आकलन करताना या निर्देशांकाचे घटक कोणते आहेत तसेच यासाठी कोणते निकष ठरविण्यात आलेले आहेत, याचबरोबर या निर्देशकांचा मानवी विकास निर्देशांकासोबत काही संबंध आहे, इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या प्रश्नाचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारे आहे, यामुळे याच्याशी संबंधित माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देता येणार नाही. याचे उत्तर ‘विधान पहिले’ हे आहे. तसेच या निर्देशांकामध्ये क्रयशक्ती साम्य, स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर इत्यादीचे मोजमाप करण्यासाठी समावेश केला जात नाही.

२०१३मध्ये ‘जनसांख्यिकीय लाभांशाचे संपूर्ण फायदे प्राप्त करण्यासाठी, भारताने काय करणे क्रमप्राप्त आहे?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि यासाठी कौशल विकास प्रसार, अधिक प्रमाणात सामाजिक सुरक्षा योजना सुरू करणे, बालमृत्यू दरामध्ये घट करणे आणि उच्च शिक्षणाचे खासगीकरण करणे असे चार पर्याय देण्यात आलेले होते. सर्वप्रथम या प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी जनसांख्यिकीय लाभांश ही संकल्पना काय आहे याची माहिती असणे गरजेचे आहे, सद्य:स्थितीमध्ये भारत हा जगातील सर्वाधिक तरुण व्यक्तींचा आणि क्रयशक्ती असणारा देश आहे आणि याचा उपयोग देशाच्या आíथक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो, अशा अनुषंगाने याचे आकलन करणे गरजेचे आहे.  हे उपलब्ध मनुष्यबळ जर कुशल आणि शिक्षित असेल तर याचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो, म्हणून ‘कौशल्य विकास कार्यक्रमाचा प्रसार’ हे या प्रश्नाचे  योग्य उत्तर आहे.

२०१५मध्ये, “BioCarbon Fund Initiative for Sustainable Forest Landscape  हा फंड कोण व्यवस्थापित करते,’ आणि “Rio+20 Conference

काय आहे?’ असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते. या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न हे या घटकाचे वस्तुनिष्ठ स्वरूप ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे या घटकाचे योग्य आकलन करून संबंधित मुद्दय़ाविषयी वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन करून अभ्यास करणे अधिक उपयुक्त ठरणारे आहे.

या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीची इयत्ता ११वीचे Indian Economic Develop-menta  आणि इयत्ता १२ वीचे Macro Economics ही पुस्तके वाचावीत, ज्यामुळे या घटकाची मूलभूत माहिती आपणाला समजते तसेच या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. यातील उमा कापिला लिखित Indian Economy: Economic Development and Policy, दत्त आणि सुंदरम लिखित Indian Economy  हे संदर्भ ग्रंथ या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच या घटकाशी संबंधित चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी योजना मासिक आणि दी हिंदू व इंडियन एक्स्प्रेस ही इंग्रजी वृत्तपत्रे वाचावीत. या पुढील लेखामध्ये आपण आíथक विकास या घटकांतर्गत येणारे कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार इत्यादीवर गतवर्षीय पूर्व परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि या मुद्दय़ाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.