आजच्या लेखामध्ये आपण ‘भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकामधील आधुनिक भारत यामधील १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड या विषयाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीविषयी यापुढील लेखात चर्चा करणार आहोत. या विभागणीमागील महत्त्वाचा उद्देश या घटकाची सखोल चर्चा करणे हा आहे, जेणेकरून अधिक सुलभतेने पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने या घटकाची तयारी करण्यास मदत होईल. याचबरोबर हा विषय मुख्य परीक्षेलाही अभ्यासावा लागणार आहे आणि या विषयाचे स्वरूप पारंपरिक प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे सखोल आणि सर्वागीण आयामाचा विचार करून या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करणे अधिक उपयुक्त ठरेल.

pun05

उपरोक्त नमूद विषयांतर्गत येणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी आत्ता आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९ व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृत्तपत्रे व ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती अभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े होती. यातील पहिले वैशिष्टय़ हे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली होती. दुसरे वैशिष्टय़ हे भारताच्या विविध प्रदेशांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आलेल्या होत्या. या सत्तांचे वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारांत केले जाते- मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता – बंगाल, अवध, हैदराबाद), मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता – मराठे, शीख, जाट व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता- म्हैसूर, राजपूत आणि केरळ) आणि तिसरे वैशिष्टय़ हे भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात विविध प्रांतांत अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांच्या अंतर्गत तसेच एकमेकांत असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एका राजकीय प्रतिस्पध्र्याच्या भूमिकेत स्थापन केलेले होते. सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिराज्य मान्य करण्यास भाग पाडले व संपूर्ण भारतभर स्वत:चा राजकीय अंमल प्रस्थापित केला. १७५७च्या प्लासीच्या लढाईपासून आपणाला ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल याच्याविषयी त्यांनी केलेली युद्धे, यांच्याद्वारे राबविण्यात आलेली सामाजिक आणि आíथक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम, त्याला भारतीयांनी दिलेले प्रतिसाद याचा अभ्यास करावा लागेल. ज्यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि याच्या परिणामस्वरूप सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळींचा भारतीयांवर झालेला परिणाम, याच्या जोडीला शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांची जनजागृती निर्माण करण्यामध्ये असलेली निर्णायक भूमिका इत्यादी घडामोडींचा; तसेच १७७२च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास म्हणून पाहतो इत्यादी संबंधित मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. यामुळे या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुख आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकते.

या विषयावर २०११ ते २०१६ मध्ये एकूण ५ प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यांचे घटकनिहाय वर्गीकरण शेजीरील तक्त्यामध्ये दिलेले आहे.

आत्ता आपण या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊ. २०११ मध्ये, ‘लॉर्ड कॉर्नवालिसने १७९३ सुरू केलेल्या जमीन समझोता पद्धतीमुळे खटल्यांमध्ये अधिक वाढ झालेली होती, याचे महत्त्वाचे कारण काय होते?’ असा प्रश्न विचारलेला होता आणि यासाठीच ‘रयतेपेक्षा जमीनदारपद अधिक मजबूत झाले’, ‘जमीनदारावर ईस्ट इंडिया कंपनीचे स्वामित्व निर्माण झाले’, ‘न्यायिक पद्धत अधिक सक्षम झाली’ आणि ‘यापकी एकही नाही’ असे चार पर्याय दिलेले होते. २०१२ मध्ये रयतवारी पद्धतीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता, ज्यामध्ये ‘शेतकऱ्यामार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे’, ‘रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता’ आणि ‘महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे’ अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती आणि यातील योग्य विधाने निवडायची होती. २०१४ मध्ये, ‘१८५८ च्या राणीचा जाहीरनाम्याचा उद्देश काय होता?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तसेच २०१२ मध्ये, ब्राह्मो समाजावर आणि २०१६ मध्ये सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाचे स्वरूप विश्लेषणात्मक पद्धतीचे होते, पण याला संकीर्ण माहितीची जोड देण्यात आलेली होती, हे वरील प्रश्नांवरून आपल्याला समजून येते. जरी या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे. त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे.

या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत, पण सर्वप्रथम या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्र लिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे आणि त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हे पुस्तक वाचावे. यापुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारतांतर्गत येणाऱ्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाचा आढावा घेणार आहोत.