उत्तर प्रदेशातील बरेली येथे दोन अल्पवयीन मुलींवर जमावाने अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दोन्ही मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतरही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. दररोज हत्या, बलात्कार, लुटमारीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यात योगी सरकार अपयशी ठरत असल्याचे या घटनांवरून दिसून येते, अशी टीका आता होत आहे. बरेलीत आजही दोन अल्पवयीन मुलींवर अॅसिड हल्ला झाला. हा हल्ला जमावाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यात या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.