मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
- कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची बदनामी केवळ राष्ट्रवादीअंतर्गत श्रेयवादातून
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुकीत गुरुवारी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ९१.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजेच २००८ मध्ये ९२.६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सलग पाचव्यांदा सत्तारूढ होण्याची आशा डाव्या आघाडीला वाटत आहे. त्यांची प्रमुख लढत काँग्रेसशी आहे.
मुख्यमंत्री माणिक सरकार, अर्थमंत्री बादल चौधरी, उच्चशिक्षणमंत्री अनिल सरकार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप राय बर्मन, माजी मुख्यमंत्री समीर रंजन बर्मन आणि आयएनपीटी पक्षाचे अध्यक्ष बिजय हरखनवाल यांच्यासह १६ राजकीय पक्षांच्या २४९ उमेदवारांचे भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाले.
खायेरपूर मतदारसंघातील बोधजंगनगर येथे एका झुडपातून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी पाच कच्चे बॉम्ब हस्तगत केले. राज्याच्या कोणत्याही भागातून अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोनमुरा आणि धर्मनगर येथील मतदान थांबविण्यात आले होते. तथापि, मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि दहा मिनिटांनी पुन्हा मतदान सुरू झाले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















