मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
देशाचे पहिले नागरिक असलेल्या राष्ट्रपतींच्या कुटुंबातील व्यक्तीने - प्रणब मुखर्जी यांचा पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ होणा-या आंदोलनांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वादळ उठले आहे. त्यामुळे त्यांना आपले शब्द मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. या विधानानंतर अभिजीत मुखर्जी यांच्या भगिनींनी आपल्या बंधुंच्या वक्तव्यावर माफीही मागितली आहे.
नटून-थटून, भरमसाठ मेकअप करून डिस्कोमध्ये जाणं आणि त्यानंतर मेणबत्त्या घेऊन निदर्शनं करणं, ही आजची फॅशन झाली आहे, असं वादग्रस्त विधान राष्ट्रपती पुत्र खासदार अभिजीत मुखर्जी यांनी केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने चांगलीच खळबळ माजली आहे. मेणबत्त्या घेऊन निदर्शनं करणाऱ्यांना वास्तवाची खरचं जाण असते का, असा सवालही अभिजीत मुखर्जी यांनी उपस्थिती केला आहे.
विद्यार्थी जीवन काय असतं, हे मला ठाऊक आहे. मेकअप करून आंदोलनात सहभागी झालेल्या महिला या विद्यार्थी आहेत का? याबाबतही मुखर्जी यांनी शंका व्यक्त केली आहे. दरम्यान मुखर्जी यांच्या या व्यक्तव्यामुळे देशातील अनेक महिला संघटना नाराज झाल्या आहेत.
राजधानीत सामूहिक बलात्कारची बळी ठरलेल्या 'त्या' पीडित तरुणीची प्रकृती बुधवारी अधिकच खालावली. त्यामुळे विशेष विमानाने तिला अधिक उपचारासाठी बुधवारी रात्री तातडीने सिंगापूर येथे हलवण्यात आले आहे.




















अभिजित मुखर्जी यांचे म्हणणे काही अंशी खरे आहे. मेणबत्ती घेऊन येणारे सर्वच काही मनापासून करत नाहीत, तर तेवढीच चमकोगिरी करायला मिळते म्हणूनदेखील येतात. पण मुखर्जीना या चमकोगिरिवर टीका करायचा नैतिक अधिकार नाहीये कारण त्यांच्या पक्षात असली चमकोगिरी आणि बूटचाटेगिरी सदैव चालू असते. मुखर्जींची जीभ बघितली तर तिचा रंग आणि सोनिया गांधी यांच्या चप्पल/बुटाचा रंग एकच आहे हे कळून येईल. पुढच्या निवडणुकीत त्या रंगात ममता बॅनर्जी यांच्या चप्पल/बुटाचा रंग अभिजित मुखर्जींच्या जिभेवर मिसळलेला आढळून येईल. थोडक्यात काय, काँग्रेसच्या वेश्येला इतरांचे सवाष्णपण तपासण्याची गरज नाही.
यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रेतास्तु न पुजन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ (मनुस्मृति ३/४६)
जेथे स्त्रियांचा योग्य मान राखला जातो तेथे सर्व देवता आनंदाने नांदतात, पण जेथे त्यांचा योग्य मान राखला जात नाही तेथे इतर क्रिया कितीही चांगल्या असल्या तरी त्या सर्व निष्फल होत असे जे स्त्रियांविषयी गौरोवोद्गार मनुने काढले आहेत. काँग्रेस पक्षात फक्त एका स्त्रिला नको तेव्हडा मान दिला जातो व तीच्या भोवती क्रिया कितीही वाईट असल्या तरी सर्व राक्षस राक्षणी स्वतः आनंदाने लाजिरवाणे जीवन जगतात. इतर स्त्रियांचे जीवन कलंकित झाले तर त्याचे देणे घेणे त्यांना काहीच नसते . उलट त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात.