मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
मुंबईहून १८० प्रवाशांना घेऊन निघालेल्या इंडिगो कंपनीचे विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याच भागात उत्तर प्रदेश सरकारचे हेलिकॉप्टर उतरत असल्याचे दिसून आल्याने वैमानिकाने विमान उतरवण्याचे टाळले, त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे. काल सायंकाळी येथील चौधरी चरणसिंग विमानतळावर विमान व हेलिकॉप्टर हे एकाच वेळी बहुतांशी एकाच भागात उतरण्याचा प्रकार घडत होता. वैमानिकाला त्याच ठिकाणी हेलिकॉप्टर दिसल्याने त्याने विमान उतरवण्याचे टाळले असे विमानतळाचे संचालक व हवाई वाहतूक नियंत्रक एस. सी. होटा यांनी सांगितले. ते हेलिकॉप्टर खूप जवळ असल्याचे वैमानिकाला दिसून आले होते. इंडिगोचे एअरबस ३२० हे विमान १८० प्रवाशांना घेऊन आले होते. त्यात सहा बालकांचा समावेश होता. तसेच विमान कंपनीचे आठ कर्मचारी विमानात होते. सरकारी हेलिकॉप्टरमध्ये कोण प्रवासी होते हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेले नाही. होटा यांनी सांगितले, की विमान व हेलिकॉप्टर अशा दोघांनीही प्रचलित नियम व पद्धतींचा अवलंब केलेला होता. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने वैमानिकाला विमान उतरवण्याची सूचना दिली होती, असा दावा विमान कंपनीच्या सूत्रांनी केला आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















