मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
"दिल्लीतील बलात्कार प्रकरणी फक्त पाच ते सहा आरोपी दोषी नाहीत. बलात्कार करणाऱ्यांइतकीच बलात्कारित तरुणीही या प्रकारात दोषी आहे. तिने बलात्कार करणाऱ्यांशी भावाचे नाते जोडून त्यांच्याकडे ते करीत असलेले कृत्य थांबविण्यासाठी याचना करावयास हवी होती. यामुळे तिची प्रतिष्ठा आणि जीव वाचला असता. एका हाताने टाळी वाजू शकते? वाजू शकते असे मला वाटत नाही,.." अशी धक्कादायक प्रतिक्रिया स्वघोषित धर्मगुरु आसाराम बापू यांनी येथे व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले,"या तरुणीने सरस्वती मंत्राचे पठन केले असते, तर तिने आपल्या मित्राबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर कोणत्याही बसमधून प्रवास केला नसता."
आसाराम बापूंच्या या वक्तव्यावर प्रमुख राजकीय पक्षांनी कडाडून टीका केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते रशीद अल्वी म्हणाले,"व्यवहारात इतक्या बाळबोध पद्धतीने घटना घडत नाहीत. महिलांना किती यातनांना तोंड द्यावे लागते ते आसाराम बापूंना कोणीतरी सांगायला हवे."
"राजकीय तसेच धार्मिक नेत्यांनी गंभीरपणे विचार करून बोलायला हवे. आसाराम बापूंसारख्यांनी इतकी बालिश सूचना करावी, हे निषेधार्ह तसेच हास्यास्पद आहे," असे भाजपचे नेते बलबीर पुंज यांनी सांगितले. विविध संकेत स्थळांवरूनही आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे.




















वा! काय पण अगाढ ज्ञान आहे. आता या देशात विद्वत्ता आणि समंजसपणा औषधालाही उरला नाही याची खात्री झाली.
अकलेचे तारे कसे तोडावेत याचे तरी भान स्वताला ” गुरु ” ? सामाज्नार्यानी ठेवायला हवे. शेळी जाते जीवानिशी आणि खाणारा म्हणतो वातड होती, आणि अश्या व्यक्तींना जे गुरु मानतात त्यांची किती कीव करावी? आसाराम बापुना सांगा तुमच्या नावातला राम काढून टाका कारण तुम्हाला राम आणि त्याचे स्त्री दाक्शिन्या समजलेच नाही. तुमच्यात काही राम नाही.
हा धर्मगुरु आहे कि अधर्म्गुरू ? ….. नाहीतरी या असाराम्बापुवर पण अशे अर्रोप केले गेले होते…..पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटते …ज्या भूमीवर तुकाराम ,गाडगेमहाराज सारखे थोर संत होऊन गेले ..त्या भूमीवर अशे ढोंगी आणि स्वघोषित संत होतात आणि लोगही अश्या पाखंडी माणसाच्या मागे मागे जातात ……आणि हा माणूस तोंडाला येईल ते बोलतो ..साबणे/तेल/अगरबत्त्या विकायचे धंदे करतो ……….. सगळेच अचंबित आहे ……
kay bolayche aata, hya GURUNNA….
rapiest haivan astat…. te bhondu nastat…..