दिल्लीत आंदोलनकर्त्यांची सत्ता आल्यास केंद्र सरकार दिल्लीचा विकास करू शकणार नाही, असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले. ते शनिवारी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. दिल्लीमध्ये ‘आप’सारख्या धरणे आणि आंदोलन करणाऱ्यांचे सरकार आल्यास दिल्लीला मदत करण्याचे केंद्राचे मार्ग खुंटतील, असे शहा यांनी यावेळी म्हटले. यापूर्वीही अन्य राज्यांमधील निवडणूक प्रचारसभांमध्ये शहा यांनी भाजपचे सरकार न आल्यास केंद्राच्या मदतीविना संबंधित राज्याच्या विकासाचे मार्ग खुंटतील, अशी अप्रत्यक्ष भीती उभी केल्याचे दिसून आले होते. दिल्लीतही अमित शहा याच प्रकारचा अवलंब करताना दिसून आले.