येथून ५५ किलोमीटर अंतरावरील मानपूर येथे काम करीत असलेल्या १० बालमजुरांची पोलिसांनी सुटका केली. एका सेवाभावी संस्थेला यासंबंधी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मजूर विभाग आणि पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून या मुलांची सुटका केली. ही मुले सात ते १७ या वयोगटातील होती.