लडाखजवळच्या चुमर भागात चीनची आगळीक सुरूच असून ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या चीनच्या सैन्यदलाने भारतीय हद्दीत सात तंबू उभारल्याचे उघडकीस आले आहे. चीनच्या या कारवायांमुळे तेथील परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. हा प्रदेश रिकामा करण्यासंबंधी भारतीय फौजांनी इशारे देऊनही चीनच्या सैनिकांनी आपले काम सुरूच ठेवले होते.