ग्राम पंचायतींमधील ‘सरपंच-पती’ संस्कृती मोडीत काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. राष्ट्रीय पंचायतीराज दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मुलन, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती या विषयावर मार्गदर्शन केले.
मोदी म्हणाले, सरपंच-पती संस्कृती सर्वत्र पसरली आहे. कायद्याने महिलांना अधिकार दिले आहेत, तर ते वापरण्याची संधी त्यांनाच मिळालीच पाहिजे. त्यामुळेच सरपंच-पती संस्कृती मोडीत काढली पाहिजे आणि महिला सक्षमीकरणाला मदत केली पाहिजे.
शाळांमधून विद्यार्थ्यांच्या गळतीवर चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, गळती रोखण्यासाठी पंचायत संस्थानी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर गावांमधील गरिबी निर्मुलनामध्ये पंचायत संस्थानी योगदान दिले पाहिजे. जर एका वर्षात एका गावामधील पाच गरिबांना गरिबीतून वर आणले, तर देशात केवढा मोठा बदल घडून येईल, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
देशातील अनेक नागरिक आजही गावांमध्येच राहतात. त्यामुळे गावांचा विकास कसा साधायचा, याचा विचार आपण केला पाहिजे. छोट्या गावांमध्ये राहणाऱया लोकांची स्वप्नंही मोठी असतात. त्यामुळे प्रत्येक पंचायत संस्थानी पुढील पाच वर्षांमध्ये आपण गावाचा कसा कायापालट करू शकतो, याचा विचार केला पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
narendra modi
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
pm narendra modi speaks to sandeshkhali rekha patra
पश्चिम बंगालच्या संदेशखाली येथील रेखा पात्रा यांना भाजपाची उमेदवारी; पंतप्रधान मोदी फोन करत म्हणाले, “शक्ती स्वरूप…”