गुजरातमध्ये नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत तिसऱ्या जागेवर काँग्रेसचे अहमद पटेल विजयी झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पटेल यांनी बाजी मारली. पटेल यांना पराभूत करण्यासाठी भाजपने विशेषत: अमित शहांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे दोन जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला पटेल यांचा विजय मात्र जिव्हारी लागल्याचे दिसते. परंतु, धक्कादायक म्हणजे पटेल यांच्या विजयाचे वृत्त केंद्रीय मंत्री स्म़ती इराणी यांना समजले. त्यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. त्यांना भाजपचे उमेदवार बलवंत राजपूत यांच्या पराभवाचे मोठे शल्य होते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आपल्या विजयानंतर भावनांवर नियंत्रण ठेवत भाषणात सर्व आमदारांचे आभार मानले होते.

ज्या तीन आमदारांनी काँग्रेसला मतदान केल्याचा दावा केला होता. त्यांनी प्रत्यक्षात भाजपला मतदान केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार (जयंत पटेल आणि कंधल जाडेजा) आणि जीपीपी पक्षाचे नलीन कटोदिया यांचा समावेश आहे. पटेल यांच्या विजयात सर्वांत मोठे योगदान संयूक्त जनता दलाचे (जेडीयू) आमदार जेडीयू आमदार छोटू वासवा यांचे असल्याचे सांगण्यात येते. महत्वाचे म्हणजे आमदार छोटू हे ज्या कारमध्ये मतदान करण्यात आले होते. ती कार भाजपची होती आणि अमित शहा यांनी त्यांचे स्वागतही केले होते.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
dombivli marathi news, dombivli varun sardesai marathi news
“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

जेडीयूने नुकतेच भाजपबरोबर बिहारमध्ये सरकार बनवले आहे. जेडीयू नेता के.सी.त्यागी म्हणाले होते की, नितीश कुमार यांनी छोटू यांना भाजप उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले होते. परंतु, त्यागींच्या या सूचनेवर पक्षाचे राज्य नेते भडकले होते. त्यागी आम्हाला सांगणार कोण आहेत, असा सवाल स्थानिक नेत्यांनी विचारला होता.