भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मुंबईत आधीच्या इंदू मिलच्या मालकीच्या जागेत चैत्यभूमीजवळ उभारण्याच्या निर्णयास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. हे स्मारक उभारण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. मुंबईतील चैत्यभूमीजवळ हे स्मारक उभारण्यात येणार असून ही जागा पूर्वीच्या इंदू मिलच्या मालकीची आहे. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येईल व राज्य सरकारशी त्याबाबत चर्चा चालू आहे. त्यातील कायदेशीर बाबी लवकर पूर्ण केल्या जातील असे वस्त्रोद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.