जनता परिवाराच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेवर अनिश्चिततेचे कोणतेही सावट नाही, ही प्रक्रिया योग्य मार्गावर आहे, विलीनीकरण होण्यास जास्त कालावधी लागणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले जनता परिवाराच्या विलीनीकरणाची गाडी योग्य मार्गावर आहे आणि ती योग्य वेगाने धावत आहे, असे नितीशकुमार यांनी येथे एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांना सांगितले.जनता परिवाराच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच पुढील तारीख निश्चित करण्यात येणार असून त्या बैठकीनंतर सर्व चित्र स्पष्ट होईल, असेही नितीशकुमार म्हणाले.