येथील बहुमजली नवीन सचिवालयास आग लागली असून ती विझवण्यासाठी २० अग्निशमन बंब पाठवण्यात आले. अग्निशमनाचे बंब पोहोचल्यानंतर दोन तासात आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले, असे अग्निशमन सेवा मंत्री जावेद खान यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.
अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, वीस अग्निशमन बंबांनी सकाळी साडेदहा वाजता सचिवालयाच्या सातव्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आणली. ऑक्सिजन सिलिंडर व मास्क घेऊन अग्निशमन जवानांनी या आगीचा सामना केला. या घटनेची चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले असून आगीचे कारण समजू शकलेले नाही. पंचायत राज मंत्री सुब्रता मुखर्जी यांनी सांगितले की, आपले कार्यालय याच इमारतीत असून आपल्या खोलीला आगीची चांगलीच झळ बसली होती.