सत्तेत आल्यास शंभर दिवसांत काळा पैसा मायदेशी आणण्याचे अश्वासन भाजपने दिले होते, मात्र सरकारला त्यात अपयश आल्याची टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथील सभेत केली.
काँग्रेसवर टीका करणारे भाजप आता काळा पैशाच्या मुद्दय़ावर प्रशासकीय कारणे सांगत आहे. या मुद्दय़ावर संयम, गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. मात्र भाजपकडे या दोन्हीही गोष्टी नसल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाची राहुल यांनी खिल्ली उडवली. लोकांच्या हाती केवळ झाडू देण्यापेक्षा जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. झारखंडमध्ये काँग्रेस थेट कधीच सत्तेत नव्हती. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून आमच्यावर टीका करू नये, असा सल्लाही त् दिला.