बिहारमध्ये पुन्हा जंगलाराज सुरू झाल्याची टीका भाजपने केली होती, त्याला मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी उत्तर दिले आहे. गोध्राचे दंगे काय होते याचे उत्तर भाजपने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही. भाजप दहा वर्षांहून अधिक काळ सत्तेत राहील, या पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दाव्याची त्यांनी खिल्ली उडवली आहे. सत्ताप्राप्तीनंतर वर्षभरातच ज्यांचा जनाधार कमी होऊ लागला आहे.