नवीन वर्षांत रेल्वेची किमान अंतरासाठी भाडेवाढ करण्याची शिफारस डी. के. मित्तल समितीने केली आहे. पॅसेंजर तसेच उपनगरी सेवेसाठीही भाढेवाढ करावी असे अहवालात म्हटले आहे. उपनगरी गाडय़ांची दर दोन महिन्यांनी प्रतिकिलोमीटर २ पैसै भाडेवाढ करावी असे समितीने सुचवले आहे.
४ डिसेंबरला स्थापन केलेल्या समितीने अहवाल सादर केला असून रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी भाडेवाढीची शिफारस केली आहे. तोटय़ातील व अनुदानित रेल्वे भाडे पद्धती मोडीत काढावी व भाडे वाढवावे असे समितीचे म्हणणे आहे. शिफारशीनुसार उपनगरी भाडे कि.मी. मागे २ पैसे दर महिन्याला वाढवण्यात यावे. लांब अंतराच्या मेल व एक्सप्रेस गाडय़ांसाठी भाडेवाढ किती करावी हे मात्र सुचवण्यात आलेले नाही. समितीने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना अहवाल सादर केला.