देशभरातील वृद्धांना आर्थिक आणि अन्नविषयक सुरक्षा, आरोग्यसेवा, निवारा तसेच वयोवृद्धांच्या इतर गरजांसाठी सरकारने पाठिंबा देण्याचा समावेश असलेले अद्ययावत राष्ट्रीय धोरण तयार करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले आहे.
‘वृद्धाश्रमांबाबतचे आपले राष्ट्रीय धोरण १५ वर्षे जुने असून तुम्ही त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. १९९९ सालापासून याबाबतीत बरेच काही घडले आहे’, असे न्या. मदन लोकूर व न्या. उदय लळित यांचा समावेश असलेल्या सामाजिक न्याय खंडपीठाने सांगितले. ‘पालक व ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल आणि कल्याण कायदा २००७’च्या अनुषंगाने १९९९ साली तयार केलेल्या वृद्धाश्रमाबाबतच्या राष्ट्रीय धोरणातही बदल करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. वृद्धांबाबतच्या राष्ट्रीय धोरणामध्ये वृद्धांना आर्थिक व अन्नविषयक सुरक्षा, आरोग्यसेवा व निवारा यासह त्यांच्या इतर गरजांची पूर्तता निश्चित करण्यासाठी सरकारच्या पाठिंब्याची तरतूद आहे.

Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
Decline in bad loans of public sector banks
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात घसरण