राबडी देवी यांच्या तर्कपूर्ण विधानामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्यांचा गणवेश बदलणे भाग पडले, असे राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. संघातील सगळे म्हातारे लोकही हाफ चड्डी घालतात. इतक्या लोकांसमोर हाफ चड्डी घालायला त्यांना लाज कशी वाटत नाही, अशा आशयाचे विधान राबडी देवी यांनी जानेवारी महिन्यात केले होते. राबडी यांच्या याच आक्रमक पवित्र्यामुळेच संघाला हाफ चड्डीऐवजी फुल पँट घालण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे लालूप्रसाद यांनी ट्विटरवरून सांगितले. सध्या भाजपची सत्ता असल्यामुळे संघाने फूल पँट घातली आहे. मात्र, २०१९च्या लोकसभा निवडणुकांनंतर त्यांना पुन्हा हाफचड्डी घालावी लागेल, असा टोला लालूप्रसाद यांनी भाजपला लगावला.