काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मोदी केवळ १५-२० जणांसाठी काम करतात आणि बाकी सर्वाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

येथे आयोजित करण्यात आलेल्या रोड-शोदरम्यान राहुल गांधी यांचे भाषण झाले. सर्वसामान्य जनतेने मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून दिले, मात्र निवडणुकीनंतर शेतकरी, दलित आणि बेरोजगार युवकांचा मोदी यांना विसर पडला, असे गांधी म्हणाले.

Anant Ambani and Radhika Marchant pri Wedding
Video : जामनगरमध्ये व्हीआयपी पाहुण्यांसाठी अंबानी कुटुंबाने उभारले आलिशान तंबू, आतील सोयी बघून तुम्हीही व्हाल थक्क
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
navi mumbai municipal corporation to open wetlands for residential complexes zws
पाणथळ जमिनींवर निवासी संकुले! नवी मुंबईत पामबीचलगत फ्लेमिंगो अधिवास धोक्यात
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

मोदी यांना केवळ १५-२० जणांसाठीच काम करावयाचे असल्यास त्यांनी ते करावे, मात्र तुम्ही देशातील अन्य जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करू शकत नाही, मोदी सरकारने सापत्नभावाची भूमिका सोडून प्रत्येक भारतीयासाठी काम केले पाहिजे याचा काँग्रेस प्रयत्न करील, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्यावर सोमवारी एका रोड-शोपूर्वी बूट भिरकावण्यात आला होता, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.