मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथील आपल्या शेवटची मैफील रंगविताना पं. रविशंकर यांना 'ऑक्सिजन मास्क'चा आधार घ्यावा लागला होता.
गेल्या ४ नोव्हेंबरला पंडितजींनी निवडक श्रोत्यांसमोर कार्यक्रम केला होता. आपली मुलगी अनुष्का शंकरसह त्यांनी ही मैफील रंगविली होती. त्या वेळी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. किंबहुना आरोग्याच्या कारणास्तव ही मैफील यापूर्वी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र अंतिमत: या बैठकीत त्यांनी 'ऑक्सिजन मास्क' लावून सतारवादन केले, अशी माहिती त्यांचे माजी सचिव आणि निकटवर्तीय राबिन पाल यांनी दिली. कोणीही केलेली कार्यक्रमाची विनंती रविशंकर नाकारत नसत, असे सांगत नवनवीन कलाकारांच्या मैफलींचे आयोजन करावे म्हणून ते आपल्याजवळ आग्रह धरीत असत. शिवाय त्या मैफलींना उपस्थितही राहात असत, असे पाल यांनी सांगितले.
वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्याची मजा काही औरच!
जगभरात भारतीय शास्त्रीय संगीत पोहोचविणाऱ्या पं. रविशंकर यांना महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेण्यांनी मोहिनी घातली होती. जगभरात अनेक व्यासपीठांवर आपल्या सतारवादनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या या स्वरसम्राटाला वेरूळ लेण्यांच्या पाश्र्वभूमीवर सतार वाजविण्यास प्रचंड आवडत होते आणि याची कबुली दस्तुरखुद्द पं. रविशंकरांनीच दिली होती.
औरंगाबाद येथे होणाऱ्या वेरूळ संगीत महोत्सवामध्ये एकदा हे गुपित त्यांनी स्वत: उघड केले होते. 'मला तुमचा हेवा वाटतो. एकाच वेळी तुम्हाला कैलास मंदिराचे सौंदर्य अनुभवताही येते आणि त्याच वेळी तुम्ही माझे सतारवादनही ऐकू शकता', असे उद्गार ९०च्या दशकांत त्यांनी वेरूळ महोत्सवासाठी जमलेल्या श्रोतृवृंदासमोर काढले होते.



















पंडितजी जेवढे श्रेष्ठ कलाकार होते तितकेच त्यांचे व्यक्तिमत्व पारदर्शक होते. आपल्या भावजीवनाविषयी ते विलक्षण मोकळे होते. त्यांचे रागमाला नावाचे चित्रांकित इंग्रजी आत्मचरित्र वाचा. ते केवढे स्पष्टवक्ते आणि आपल्या जीवनाविषयी पारदर्शक होते ते कळून येईल. माझ्या मते कुठल्याही भारतीय प्रसिद्ध व्यक्तीने आपले आत्मचरित्र एवढ्या स्वच्छपणे लिहिलेले नसेल. ते आहे त्या स्वरुपात (आतील चित्रांसकट) कोणीतरी मराठीत तितक्याच स्पष्टपणे अनुवादित करायला हवे.