मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
काँग्रेसचे माजी मुंबई विभागीय अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या बेहिशेबी संपत्तीप्रकरणी दोन महिन्यांच्या आत अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एच. एल. दत्तू यांनी सोमवारी विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले.
एसआयटीकडून या प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबद्दल न्या. दत्तू यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर एसआयटीच्या वतीने अहवाल सादर करण्यासाठी सहा आठवडय़ांचा अवधी मागण्यात आला, पण न्यायालयाने सहाऐवजी आठ आठवडय़ांमध्ये अहवाल सादर करण्याची मुभा दिली. मात्र या कालावधीत सर्व चौकशी पूर्ण करण्याचे आदेश देताना याप्रकरणी आणखी मुदतवाढ मिळणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बेहिशेबी संपत्ती जमविल्याचे धडधडीत पुरावे असताना विशेष तपास पथक त्यांना अटक का करीत नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करताना केला.
कारवाईत विलंब करून विशेष तपास पथक कृपाशंकर यांच्या कुटुंबीयांच्या गुन्हेगारी कृत्याला मदत करीत असल्याचा आरोपही त्यांनी सुनावणीदरम्यान केला.




















न्यायालयाचे शतशः आभार आणि अभिनंदन. न्यायालयाच्या अशा निर्णयांमुळे कुठे तरी आशा वाटते कि कमीत कमी न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट नाही. नाही तर ह्या कृपाला तर सरकारने मोकळेच सोडले होते. देव करो आणि कृपाशंकर सारख्या भ्रष्ट नेत्यांना कडक शिक्षा होवो.