भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल ३०५० कोटींचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला ‘इंटरकनेक्शन‘ सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे या कंपन्यांना दंड ठोठविण्याची शिफारस करण्यात आल्याचे ट्रायने सांगितले. यानुसार, भारती एअरटेल आणि व्होडाफोन यांना २१ सर्कलमध्ये प्रत्येकी ५० कोटी आणि आयडियाला १९ सर्कलमध्ये प्रत्येकी ५० कोटी रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.
रिलायन्स जिओमुळे आयडिया, एअरटेलचे १५,८४० कोटींचे नुकसान
रिलायन्स जिओने ५ सप्टेंबरपासून आपली सेवा सुरू केली होती. मात्र, जिओने मोबाइल ग्राहकांवर सवलतींचा वर्षाव केल्यामुळे एअरटेल, आयडिया व रिलायन्स कम्युनिकेशनचे शेअर्स धडाधड कोसळले होते. त्यानंतर या कंपन्यांनी रिलायन्स जियोला इंटरकनेक्शन पॉईंट्स उपलब्ध न करुन दिल्याने जियोच्या क्रमांकावरुन ही तीन नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना कॉल करण्यास अडचणी येत आहेत, असा आरोप रिलायन्स जियोतर्फे करण्यात आला होता. रिलायन्स जिओच्या ७५ टक्के ग्राहकांना एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर नेटवर्कवर फोन करताना अडचणी येत होत्या. ट्रायने आखून दिलेल्या नियमांनुसार १००० कॉलमधील पाचपेक्षा जास्त कॉल्स कट होऊन चालत नाही. मात्र, एअरटेल, आयडिया या कंपन्यांकडून या नियमांचे पालन होत नाही. अशा स्थितीत संबंधित कंपन्यांचे लायसन्सही रद्द होऊ शकते.
‘रिलायन्सच्या मोफत कॉलिंगमुळे दूरसंचार उद्योगच संपेल’