पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नसल्याची टीका केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी मंगळवारी केली. आपल्याच पक्षाच्या नेत्याकडून पंतप्रधानांना घरचा आहेर मिळाला आहे. जयस्वाल कानपूरमधून कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. डॉ. सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नसल्याचे परिणाम यूपीए सरकारला भोगायला लागले, अशीही टीका जयस्वाल यांनी केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्याने थेट पंतप्रधानांवर जाहीरपणे टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.