मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
वॉलमार्टने लॉबिंगवर १२५ कोटी रूपये खर्च केले गेल्याच्या आरोपांवर बोलताना अमेरिकेने म्हटले आहे कि, वालमार्टने कोणत्याही अमेरिकी कायद्याचे उल्लंघन केलेले नाही.
भारतीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या लॉबिंगवर वॉलमार्टने १२५ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप काल (सोमवार) विरोधकांनी संसदेत केला होता. मात्र, अमेरिकेने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते विक्टोरिया नुलैंड यांनी भारतातील विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना धुडकावून लावत म्हटले आहे कि, 'अमेरिकेच्या दृष्टीने आम्ही येथे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले आहे असे आम्हाला वाटत नाही. याबाबतीतील अधिक माहितीसाठी तुम्ही भारताबरोबर चर्चा करावी'.
त्या पुढे म्हणाल्या कि, आम्ही या बातम्या पाहिल्या आहेत. अमेरिकेसंदर्भात लॉबिंगच्या मुद्याबाबत मला वाटते कि, तुम्हाला लॉबी डिस्क्लोजर अॅक्ट १९९५ आणि ऑनेस्ट लीडरशिप अॅण्ड ओपन गवर्नमेंट अॅक्ट २००७ बदद्ल माहिती असेल, ज्यामध्ये प्रत्येक कंपनीला एका अहवालामध्ये आपल्या लॉबिंग संबंधातील घडामोडींबद्दल माहिती द्यावी लागते.
नुलैंड पुढे म्हणाल्या, 'या आरोपांमध्ये ज्या अहवालाचा दाखला देण्यात आला आहे त्यामध्ये अमेरिकेत वेळोवेळी मागवण्यात आलेला एक अहवाल आहे. तो आमच्या सरकारच्या पारदर्शी कारभाराचा एक भाग आहे. दरम्यान, वॉलमार्टने कोणत्याही चुकीच्या घडामोडींमध्ये गुंतले असल्याचा इन्कार केला आहे.
हे सर्व आरोप खोटे असल्याचे, कंपनीच्या एका प्रवक्त्याने स्पष्ट केले. अमेरिकेच्या कायद्यानुसार अमेरिकेतील कंपन्या लॉबिंगशी निगडीत प्रकरणांची आणि खर्चाची दर तीन महिन्याला माहिती देत असतात. यामध्ये लॉबिंगशी निगडीत कर्मचारी आणि वकिलांचा खर्चही समाविष्ट असतो.



















लोकसत्ताकारांनी अमेरीकेप्रती फारच सहानुभूतीपूर्वक बातमी छापली आहे. भारतात होणाऱ्या अमेरिकापुरस्कृत आर्थिक अतिक्रमणाचे समर्थन करताहात, त्याबद्दल ‘आभार’! याउलट आपण भारतीयांना अमेरिका हुंगतही नाहीत. आपल्या किती कंपन्यांना तिथे वा युरोपात लॉबिंग करू देतात हे गोरे लुटारू? वरून चोरी करूनही स्पष्टीकरण द्यायला मोकळे! केवळ पैसा हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन विकास होतो हा भाबडा समज आपण भारतीयांनी दूर करायला पाहिजे. उद्या FDI मध्ये अमेरिकेतून येणारे दुध वा इतर अन्न, आपण चांगल्याप्रतीचे आहे म्हणून मस्त खाऊ आणि हळूहळू mass killing चे बळी होऊ. तेच आपल्या घरात होणारं दुध-दुभतं ‘स्वच्छतेच्या’ नावाखाली फेऊन देऊ. आणि ह्याची सुरुवात (genetic manipulation, उदा. बीटी वांगे) बीटी च्या गोंडस नावाखाली झाली आहे, ज्याचा विकसित देशात साधा प्रयोगही करू दिला जात नाही, खाणं तर दूरच! Bayer, Monsanto, Syngenta इ. हे उघडपणे भारतात करताहेत. भोपाळ gas trajedy वरून आपण काही बोध घ्याला हवा.
गोरे ख्रिश्चन (अमेरिका आणि युरोप) श्रीमंत देश, धर्माला पुढे करून जगाचा सत्त्यानाश करायला निघाले आहे. त्यांच्या दैनंदिन घडामोडीत धर्म हाच मोठा factor असतो. आणि नसेल तर Vetican City तसे करायला भाग पाडते. वरून जरी फार सोज्वळ दिसत असले वा इतर धर्मांविषयी सहानुभूती दाखवत असले, तरी आतून त्यांचा इतर धर्मांविषयीचा द्वेष कायम आहे. आणि म्हणून मुस्लीम राष्ट्र असो, चीन असो वा भारत असो इथल्या साऱ्या लोकांविषयी असलेला द्वेष वेळोवेळी दिसून पडतो. अलीकडच्या अनेक घटनांवरून हे दिसून येते. विशेषतः भारतीयांविषयी फारच द्वेष ठेवतात. कदाचित ह्याच्यातूनच भारताला ते एक ‘experimental hub’ म्हणून वापरतात. FDI ने त्यांना पैसाहि मिळेल आणि भारताचा सत्त्यानाशहि झालेला दिसेल.