तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असून, पराभवाची कारणमीमांसा पक्षाकडून लवकरच केली जाईल, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.


तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चारही राज्यांत काँग्रेसला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापैकी केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसने सत्ता गमावली आहे. या पार्श्वभूमीवर, या राज्यांमध्ये पराभव का झाला त्याच्या कारणांचा शोध घेण्यात येईल आणि पुन्हा एकदा या राज्यातील नागरिकांच्या सेवेमध्ये आम्ही सर्वजण जोमाने उतरू, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पुडुचेरीमधील जनतेने काँग्रेसवर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी तेथील जनतेचे आभार मानले आहेत.