पश्चिम घाटाच्या संवर्धनाबाबत डॉ.माधव गाडगीळ यांच्या समितीने दिलेला अहवाल अखेर सरकारने गुंडाळला असून त्याऐवजी कस्तुरीरंगन समितीचा अहवाल मान्य केला आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या पुढे सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
वन व पर्यावरण खात्याने याबाबत के.कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी करण्यात येईल. गाडगीळ समितीचा अहवाल विचारात घेतला जाणार नाही असे म्हटले आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे न्या.स्वतंत्रकुमार यांनी  वन व पर्यावरण खात्याच्या सरकारी वकिलास यावर ९ सप्टेंबपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.
गोवा फाउंडेशन व पीसफुल सोसायटी या दोन स्वयंसेवी संस्थांच्या वतीने लवादापुढे याचिका दाखल करण्यात आली होती. गाडगीळ समितीने आपला अहवाल ३१ ऑगस्ट २०११ रोजी सादर केला होता. त्यात पश्चिम घाट पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील असल्याचे म्हटले होते. गोव्यातील पश्चिम घाटात खाणकाम करू नये असे गाडगीळ समितीने म्हटले होते.

Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Parakala Prabhakar criticism of the government development work Pune news
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीचे सरकारवर टीकास्र, म्हणाले, ‘विकास होत असल्याचे दाखवण्याची सरकारला घाई’
supreme court
तथ्यशोधन कक्षाबाबतच्या अधिसूचनेला स्थगिती
Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका