मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
बलात्कार 'इंडिया'त होतात भारतात नव्हे, या वक्तव्याने गदारोळ उडवून देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी आता लग्नकरारानुसार स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडू नये आणि नवऱ्याने बाहेरकाम करावे, असा नवा सल्ला देऊन पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
इंदूरमध्ये कार्यकर्त्यांसमोर शनिवारी बोलताना भागवत यांनी विवाहाच्या कराराचा दाखला दिला. ते म्हणाले, लग्नकरारात पती आणि पत्नी एकमेकांना काही हमी देतात. तू माझ्या घराची काळजी घे आणि मी तुझ्या गरजा पूर्ण करीन, तुझे संरक्षण करीन, अशी हमी नवरा देतो. मग जोवर पत्नीही करार पाळते तोवर तो तिच्यासह राहातो आणि जर तिने करारभंग केला तर तो तिचा त्याग करू शकतो, अशी मुक्ताफळे भागवत यांनी उधळली आहेत.
मार्क्सवादी नेत्या वृंदा करात यांनी खरमरीत भाषेत टीका करीत सांगितले की, या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटत नाही.
संघाचे खरे स्वरूपच त्यातून उघड होते. त्यांना पुन्हा मनुस्मृती देशात लागू करायची आहे. महिलांना दुय्यम मानणारी आणि त्यांना पुरुषांची दासी मानणारी ही प्रवृत्ती आहे.संघप्रवक्ते राम माधव यांनी भागवत यांच्या विधानांचा पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला गेल्याचा दावा केला आहे. पाश्चात्य देशांत लग्नाला करार मानले जाते तर आपण त्याला पवित्र बंधन मानतो. येथे संपूर्ण कुटुंबाची पतीवर काहीतरी जबाबदारी आहे, याचे भान भागवत देत होते.




















Once Jyotirao stopped a pregnant lady from committing suicide, promising her to give her child his name after it was born. Savitribai readily accepted the lady in her house and willingly assured to help her deliver the child. Savitribai and Jyotirao later on adopted this child who then grew up to become a doctor. This incident opened new horizons for the couple. Many women were driven to commit suicide by men who had exploited them to satisfy their lust and then deserted them. Therefore, Savitribai and Jyotirao put boards on streets about the “Delivery Home” for women on whom pregnancy had been forced. The delivery home was called “Balhatya Pratibandhak Griha”. हा भाग http://en.wikipedia.org/wiki/Savitribai_फुले येथून घेतला आहे. माझ्या मते श्री भागवत हि गोष्ट विसरले असतीलही पण समाज मात्र विसरलेला नाही. मुंडण केलेल्या विधवा स्र्तीयानी काय भोगलाय, आणि घरातही काय चालायचे ते सर्वाना माहीतच आहे. स्त्रियांनी नाही तर पुरुषांनी बदलण्याची गरज आहे.
इंडिया तील लोकांच्या कष्टाने आपला देश एक पाऊल पुढे जातो तर यांच्यासारख्या भारतीय लोकांमुळे दोन पाऊले मागे येतो. म्हणे बलात्कार इंडिया त होतात भारतात नाही.