नैराश्याने ग्रासलेल्या एका महिलेने पोटच्या तीन मुलींची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना राजस्थानमधील अलवार जिल्ह्य़ात घडली आह़े  मोनिका (६), खुशबू (४) आणि मुस्कान (२) अशी या मुलींची नावे असून या तिन्ही मुली २८ वर्षीय आई विणाबाई कोली यांच्यासह मंगळवारपासून घरातून गायब होत्या़  सायंकाळी विणाबाई घरी परतली तेव्हा सासरच्या मंडळींनी मुलींबाबत विचारणा केली़  तेव्हा मुलींना टेकडीवर ठार केल्याचे त्यांनी सांगितल़े  घरच्यांना घटनास्थळी मुलींचे मृतदेह सापडल़े  त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.