बांगलादेशात अविजित रॉय, अनंता बिजॉय दास, वशीकुर रहमान बाबू या ब्लॉगर्सच्या हत्येची चौकशी करून संबंधितांना शिक्षा करावी  असे आवाहन वादग्रस्त लेखक सलमान रश्दी, अमिताव घोष, मार्गारेट अटवूड यांनी तेथील सरकारला केले आहे.
जगातील दीडशे लेखकांनी केलेल्या आवाहनात ब्लॉगर्सच्या हत्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून लेखक व पत्रकारांविरोधाचे मतस्वातंत्र्य धोक्यात आणून त्यांच्यावर केलेले हल्ले योग्य नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. आवाहन करणाऱ्यात कोलकात्याचे अमिताव घोष व नील मुखर्जी, कादंबरीकार रोहिंटन मिस्त्री यांचाही समावेश आहे.