मोटार वाहन कायद्याच्या कलम ११८ नुसार केंद्र सरकारला भारतातील रस्त्यांवर मोटार वाहन चालवताना काय नियम असावे हे ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यानुसार दिनांक १ जुल १९८९ पासून रुल्स ऑफ रोड रेग्युलेशन लागू करण्यात आलेले आहेत . यामध्ये एकूण ३३ मुख्य नियम आहेत. त्यापकी शेवटचा नियम क्रमांक ३३ खाली देण्यात येत आहेत.

३३) प्रत्येक वाहनचालकाला मोटार वाहन कायदा १९८८ ची खालील कलमे माहीत असणे आवश्यक आहे . कलम ११२,११३,१२१,१२२,१२५,१३२,१३४,१८५,१८६,,१९४, २०७.
सदर कलमे खालीलप्रमाणे आहेत .
कलम १३४ : अपघात घडणे आणि व्यक्तीला किंवा व्यक्तींना इजा होणे अशा परिस्थितीमध्ये मोटार वाहनाच्या चालकाचे कर्तव्य : जेव्हा एखाद्या मोटार वाहनाचा अपघात झाला असेल आणि या अपघाताच्या परिणामस्वरूप व्यक्तींना इजा झाली असेल किंवा त्रयस्थ पक्षाच्या मालमत्तेची हानी झाली असेल अशा परिस्थितीमध्ये मोटार वाहनाच्या चालकाने किंवा वाहनाचा ताबा ज्याच्याकडे सोपवलेला आहे अशा व्यक्तीने
अ ) जखमी व्यक्तीला त्वरित वैद्यकीय देखरेखीखाली सोपवण्यासाठी सर्व सयुक्तिक पावले उचलावीत. त्याने अशा जखमी व्यक्तीला सर्वात जवळच्या वैद्यकीय व्यावसायिकाकडे अथवा इस्पितळामध्ये घेऊन जावे. अशा प्रकरणांत संबंधित वैद्यकीय व्यावसायिकाचे किंवा इस्पितळातील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरचे हे कर्तव्य असेल की त्याने ताबडतोब कोणत्याही कार्यपद्धतीचा बाऊ न करता सदर जखमी व्यक्तींना देखरेखीखाली घ्यावे आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करावेत. मात्र जर संतप्त जमावामुळे किंवा अशा इतर सयुक्तिक कारणाने जर हे करणे शक्य झाले नसेल तर तसे न केल्याबद्दल मोटार वाहन चालक किंवा मोटार वाहनाचा ताबेदार यांना जबाबदार धरले जाणार नाही.
ऑटो रिक्षा बिल्ला ट्रान्सपोर्ट लायसेन्स असणाऱ्या ऑटोचालकांना मिळतो, बिल्ला असल्याशिवाय रिक्षा परमिटसाठी अर्ज करता येत नाही. अर्जदाराला ट्रान्सपोर्ट लायसेन्स मिळण्यासाठी पूर्वअट म्हणजे एक वर्ष जुने नॉन ट्रान्सपोर्ट लायसेन्स धारण केलेले असावे. क्रमश: