असे का होते?
आयुर्वेदानुसार, वाढणारी उष्णता व शरीरातील जास्तीचे पित्त यामुळे अंत:त्वचेला इजा होऊन तोंड येते. पोट साफ नसेल तर हे लवकर बरे होत नाही.
उपाय काय?
* १०-१२ काळे मनुके रात्री पाण्यात भिजत घालावेत. ते सकाळी बारीक चावून खावे.
* सकाळी-सायंकाळी एक-एक चमचा गुलकंद खावा.
* जखमांना ज्येष्ठमध किंवा शुद्ध गेरूची पूड लावावी.
* अंजीर, द्राक्ष ही फळे खावीत. आहारात दूध, नारळ पाणी, कोथिंबीर यांचा समावेश असावा.
* रोज रात्री त्रिफळा चूर्ण घ्यावे.
यामुळे काय होते?
* पोट साफ होऊन वाढलेले पित्त शरीराबाहेर पडते. जखमा लवकर बऱ्या होतात.
इतर काय काळजी घ्यावी?
* आंबट, तिखट, खारट पदार्थ (उदा. दही, मसाले, लोणचे, इत्यादी.) खाऊ नयेत.
* साधे उकडलेले जेवण घ्यावे.
* जास्त बोलणे व जागरण टाळावे.
वैद्य सदानंद सरदेशमुख

Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात