मुखपृष्ठ >> ठाणे वृत्तान्त >> वाडय़ात पी.जे. हायस्कूलमध्ये पोषण आहाराचा काळाबाजार
 


स्पर्धेचे नियम व अटी




वाडय़ात पी.जे. हायस्कूलमध्ये पोषण आहाराचा काळाबाजार Bookmark and Share Print E-mail
वाडा/वार्ताहर
येथील पी.जे. हायस्कूलमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाकडून दिला जाणाऱ्या पोषण आहारातील तांदळाचा मोठय़ा प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे तालुकापुरवठा अधिकाऱ्याने टाकलेल्या धाडीत उघड झाले आहे.पी.जे. हायस्कूलमध्ये पाचवीत ३५३ विद्यार्थी व सहावी ते आठवीमध्ये ११४९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पाचवीतील प्रति विद्यार्थी १०० ग्रॅम, तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम अन्न शिजवून पोषण आहार देण्याचे शासनाचे धोरण आहे. या शाळेतील निम्म्याहून अधिक विद्यार्थी पोषण आहार खात नसून, सर्वच विद्यार्थी पोषण आहार खात असल्याचे कागदोपत्री दाखविले जाते, अशी माहिती मिळाल्याने तालुकापुरवठा निरीक्षक ए.व्ही. आळशी यांनी अचानक या शाळेला भेट दिल्यानंतर २२ क्विंटल तांदूळ अधिक शिल्लक असल्याचे आढळून आले. शिल्लक तांदळाचा नेहमीच काळाबाजार होत असल्याचेही पुरावे आळशी यांना मिळाल्याचे समजते.खर्ची पडलेल्या धान्यापेक्षा २२ क्विंटल धान्य ज्यादा राहिल्याने प्रत्यक्षात नियमाप्रमाणे पूर्ण धान्य शिजवले जात नसल्याचेही या प्रकारामुळे आढळून आले आहे. येथील पोषण आहारासंदर्भात अधिक चौकशी केली असता खिचडीशिवाय विद्यार्थ्यांना अंडे, केळी, बिस्किटे, दूध, खजूर देणे क्रमप्राप्त असताना गेल्या वर्षभरात एक-दोन वेळाच या पोषण आहाराचा पुरवठा केला आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार या पोषण आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती नियुक्त केली जाते, तेव्हा या समितीच्या हा प्रकार निदर्शनास आला नाही का? की त्यांचाही या प्रकारात सहभाग असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पोषण आहार भ्रष्टाचारामध्ये शाळेतील काही कर्मचारी, पदाधिकारीही गुंतलेले असल्याचे समजते. या प्रकाराची योग्य चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सेवाभावी संस्थांनी केली आहे.   
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे!
साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ
अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप  सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे.

दिनदर्शिका

दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१.
मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल,  मीन - निर्धाराने पुढे चला.
शुभराशी : कन्या, तूळ, धनू.