|
|
|
भरती होताच पोलिसांना मिळते ‘हप्त्याचे प्रशिक्षण’!
|
|
|
|
|
प्रशिक्षणात सवलती देण्यासाठी घेतली जाते चिरीमिरी अभिजित घोरपडे , पुणे, १८ नोव्हेंबर
मुंबईतील हल्ल्यानंतर पोलीस प्रशिक्षणात सुधारणा करण्याच्या वल्गना सरकारकडून होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र जवानांना भरती झाल्यानंतर ‘हप्त्याचे प्रशिक्षण’ देण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश पोलीस प्रशिक्षण विद्यालयांमध्ये जवानांना कष्टप्रद प्रशिक्षणातून सवलती देण्यासाठी त्यांच्याकडून सर्रास हप्तावसुली होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
*हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात. *प्रशिक्षणात सवलती देण्यासाठी प्रत्येकी ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम वसूल केली जाते. *हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात. सर्वसाधारण प्रशिक्षणाबरोबरच खास कमांडो प्रशिक्षणातूनही अशाप्रकारे हप्ता घेऊन सूट दिली जात आहे. त्यामुळे राज्यात मोठय़ा प्रमाणावर पोलीस भरती होऊनही त्यांच्या प्रशिक्षणाचा दर्जा व पोलीस दलाच्या क्षमतांबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत. राज्यात दरवर्षी ११ हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकतीच १५ हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा केली. या घोषणांनुसार नसली तरी सध्या तुलनेने मोठय़ा संख्येने पोलिसांची भरती सुरू आहे. त्यांना राज्यातील मरोळ (मुंबई), नानवीज (दौंड), बाभूळगाव (लातूर), नागपूर, जालना, सोलापूर, खंडाळा, अकोला या आठ पोलीस प्रशिक्षण विद्यालयांमध्ये प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यापैकी नागपूर आणि खंडाळा येथे मुलींना प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सांगली व धुळे येथे आणखी दोन प्रशिक्षण विद्यालये उभी राहात आहेत. प्रत्येक ठिकाणी साधारणत: ९०० ते १२०० जवानांच्या भरतीची क्षमता आहे. प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी साडेतीन महिने प्रशिक्षण आणि या विद्यालयांमध्ये साडेपाच महिन्यांचे असे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण या जवानांना दिले जाते. या विद्यालयांमध्ये प्रति ३० ते ३५ जवानांसाठी एक प्रशिक्षक, तर २५ ते ३० महिला जवानांसाठी एक प्रशिक्षक नेमण्यात येतो. शारीरिक क्षमतेच्या प्रशिक्षणाच्या वेळी सुरुवातीला जवानांना कष्टप्रद प्रशिक्षण दिले जाते आणि जवानांनी सवलती मागितल्या की त्यांच्याकडून या प्रशिक्षकांमार्फत पैसे गोळा केले जातात. विविध विद्यालयांनुसार प्रत्येकी ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत ही रक्कम वसूल केली जाते. ही माहिती बाहेर न बोलण्याबाबत ताकीदही दिली जाते. याशिवाय कायदा, सीआरपीसी, आयपीसी, पोलीस प्रशासन या विषयांबाबत जे ‘इनडोअर’ प्रशिक्षण देण्यात येते. त्यात उत्तीर्ण करण्यासाठीसुद्धा पसे घेतले जातात, अशी माहिती प्रत्यक्ष जवानांनीच ‘लोकसत्ता’ला दिली. मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर जवानांना २१ दिवसांचे कमांडो प्रशिक्षण दिले जाते, पण या प्रशिक्षणाच्या दरम्यानही सवलत मिळविण्यासाठी प्रत्येक जवानाकडून पाचशे रुपये घेतले जातात. त्यामुळे दर्जेदार प्रशिक्षणाची मनापासून इच्छा असलेल्या जवानांची कुचंबणा होते. या गैरप्रकारांचा परिणाम म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक जवानांना नीटपणे रायफलही चालविता येत नाही. याबाबत जवानांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना संताप व्यक्त केला. अशा हप्त्यांबरोबरच प्रशिक्षकांना खुश करण्यासाठी ‘पाटर्य़ा’वरही शेकडो रुपये उडवावे लागतात. अशा व इतरही अनेक गैरप्रकारांना तोंड द्यावे लागत असल्याची कैफियत जवानांनी मांडली.
ना वीज, ना पाणी म्हणजे ‘नानवीज’! पोलीस प्रशिक्षण विद्यालयांच्या दर्जाबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुणे जिह्य़ातील दौंडजवळील नानवीज येथील विद्यालयासाठी पंधरा वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणातर्फे जलवाहिनी मंजूर झाली आहे. पण प्रत्यक्षात त्याचे पाणी विद्यालयाला मिळत नाही. परिणामी वर्षभर टँकरनेच पाणी पुरवावे लागते. परिसरातील भूजलाच्या प्रदूषणामुळे असे दूषित पाणीच जवानांना प्यावे लागते. विजेची व्यवस्थासुद्धा पुरेशी नाही. त्यामुळे नानवीज येथील विद्यालयाचे वर्णन ‘ना वीज ना पाणी’ असे केले जाते.
|
|
लोकरंग
साहित्यव्यवहाराचा बोन्साय होतो आहे! साहित्य व्यवहार समीक्षा प्रकाशन संमेलने महामंडळ अरुण जाखडे , रविवार, २९ ऑगस्ट २०१०
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अनेक चर्चा, वाद, आरोप, प्रत्यारोप सतत होत आलेले आहेत. ज्यांचा साहित्याशी काही संबंध नाही असेही लोक उत्सुकतेपोटी, कधी भाबडेपणाने, कधी उपहासाने, तर कधी पोटतिडिकीने बोलताना आपण पाहतो. माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, समाजाचा, शासनाचा व शासनमान्य संस्थांचा पैसा संमेलनाला मिळत असल्यामुळे त्यांनी असे काही बोलण्यात चूक नाही. गेल्या शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या साहित्य संमेलनाची कार्यपद्धती आज पुन्हा एकदा तपासून घेणे, त्याचे पुनर्मूल्यांकन करणे आणि हा सोहळा अधिक पारदर्शी होणे- यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. |
दिनदर्शिका
दिनांक ३ सप्टेंबर २०१०. शुक्रवार, मिती श्रावण वद्य नवमी ९ क. ५१ मि.पर्यंत, मृग नक्षत्र १२ क. ३२ मि.पर्यंत, मिथुन चंद्र. सूर्योदय-६/२५, सूर्यास्त- ६/५१. मेष - प्रिय आप्तांच्या भेटी होतील, वृषभ - अचानक उधारी वसूल होईल, मिथुन - प्रयत्नांती परमेश्वर, कर्क - धावपळ गर्दीचा दिवस, सिंह - पेचप्रसंग सुटतील, कन्या - नवीन प्रयोगात यश, तूळ - महत्त्वाची कामे होतील, वृश्चिक - चकमकी टाळा, धनू - शुभवार्ता समजतील, मकर - शुक्लकाष्टे मागे लागतील, कुंभ - महत्त्वाचा दस्तऐवज सापडेल, मीन - निर्धाराने पुढे चला. शुभराशी : कन्या, तूळ, धनू.
|