आयपीएलच्या २०१२च्या सत्रात सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालणाऱ्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी वानखेडे स्टेडियमचे दरवाजे गेल्या तीन वर्षांपासून बंद आहेत. या धिंगाण्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशने (एमसीए) त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे. म्हणूनच १४ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडेवर होणारी लढत त्याला प्रत्यक्षात पाहता येणार नाही. ‘‘ त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारच्या लढतीत त्याला स्टेडियमवर उपस्थित राहता येणार नाही.’’, असे एमसीएच्या एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.